शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

गोखीच्या पाण्याची जूनअखेरपर्यंत साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:08 IST

पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू असलेल्या यवतमाळकरांना गोखी प्रकल्पातून मोठा दिलासा मिळणार आहे. कारण या प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा जूनअखेरपर्यंत यवतमाळकरांची तहान भागविण्यास पुरेसा ठरणार आहे. खुद्द सिंचन विभागाच्या अभियंत्यांनीच ‘लोकमत’ला ही माहिती दिली आहे.

ठळक मुद्देयवतमाळकरांनो, रहा बिनधास्त : पण काटकसर गरजेचीच, दररोज मिळते ४० लाख लिटर पाणी

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू असलेल्या यवतमाळकरांना गोखी प्रकल्पातून मोठा दिलासा मिळणार आहे. कारण या प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा जूनअखेरपर्यंत यवतमाळकरांची तहान भागविण्यास पुरेसा ठरणार आहे. खुद्द सिंचन विभागाच्या अभियंत्यांनीच ‘लोकमत’ला ही माहिती दिली आहे. या प्रकल्पातून दररोज ४० लाख लिटर पाणी उपलब्ध होत आहे.गोखी प्रकल्पात सध्या १.१९ दलघमी उपयुक्त जलसाठा तर ७.५१ दलघमी मृतसाठा आहे. योग्य नियोजन केल्यास पाणीटंचाईच्या तीव्रतेला आटोक्यात ठेवण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. शहराला दैनंदिन ३०० लाख लिटर पाण्याची आवश्यकता असताना सद्यस्थितीत या प्रकल्पातून ४० लाख लिटर पाणी मिळत आहे. पाणी अपुरे असले तरी टंचाईत दिलासा देण्यास पुरेसे आहे.दारव्हा तालुक्यातील गोखी नदीवर पाथ्रड देवी येथे हा प्रकल्प आहे. मूळ उद्देश सिंचन असलेल्या या प्रकल्पातून यवतमाळच्या एमआयडीसीला नियमित पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी धरणाच्या तीरावर जॅकवेल तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी २५० हॉर्सपॉवरचे दोन मोटारपंप लावलेले आहेत. आता या दोन पंपाच्या सहाय्याने दररोज ७० लाख लिटर पाणी उपसले जाते. लोहारा एमआयडीसी स्थित जलशुद्धीकरण केंद्रातून या पाण्याचे वितरण होत आहे. एमआयडीसीतील उद्योगासाठी ३० लाख लिटर तर यवतमाळ शहरासाठी ४० लाख लिटर पाणी दिले जात आहे. या ठिकाणावरून दर्डानगर, सुयोगनगर आणि लोहारा येथील टाकीसोबतच तेथे येणाऱ्या प्रत्येक टँकरला पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. पाणी शुद्धीकरण करून वितरित केले जात असल्याचा दावा एमआयडीसीच्या सूत्रांनी केला आहे.यवतमाळात पाणी वितरणासाठी ३५ हजार लिटरच्या टँकरचे पाच पॉर्इंट निर्माण केले आहे. त्यावरून छोटे टँकर भरुन शहरात वितरण केले जाणार आहे. पूर्वी एमआयडीसीतील जलशुद्धीकरण केंद्रावर होणारी गर्दी यामुळे नियंत्रित करण्याचा प्रयत्न आहे.गोखीच्या मृतसाठ्यातूनही पाणी उपसा करण्याची तयारी केली आहे. सध्या या प्रकल्पात ७.५१ दलघमी मृत पाणीसाठा असल्याने तो ३० जूनपर्यंत उपलब्ध क्षमतेने वितरित केला जाईल. टंचाईच्या काळात हा प्रकल्प खऱ्या अर्थाने संजीवनी ठरत आहे. गरज आहे ती या टंचाईच्या काळात गोखीतून येणाऱ्या पाण्याच्या योग्य नियोजनाची.भीषण टंचाईतही उद्योगांना दररोज ३० लाख लिटर पाणी कसे ?यवतमाळ शहरात १९७१ नंतर पहिल्यांदाच एवढी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आबालवृद्धांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गुंडभर पाण्यासाठी रोजगार बुडवून रात्र जागून काढावी लागत आहे. निळोणा, चापडोह प्रकल्प पूर्णत: आटल्याने आता केवळ गोखी प्रकल्पावर यवतमाळकरांची तहान अवलंबून आहे. त्यामुळे तेथील पूर्ण पाणीसाठा शासनाच्या नियमानुसार केवळ पिण्यासाठी आरक्षित असणे बंधनकारक आहे. मात्र सिंचन विभाग हे बंधन झुगारुन उद्योगांना दररोज ३० लाख लिटर पाणी उपलब्ध करून देत असल्याची माहिती पुढे आली आहे. ते पाहता मानवी जीवन वाचविणे महत्वाचे की उद्योग वाचविणे असा प्रश्न निर्माण होत आहे. गोखीतील पाणी साठ्यावर जूनपर्यंत यवतमाळकरांची तहान भागणार आहे. पाऊस वेळेत न आल्यास जूननंतर पाणी संकट गंभीर होऊ शकते. हा धोका लक्षात घेऊन उद्योगांना दरदिवशी दिल्या जाणाºया ३० लाख लिटर पाणीपुरवठ्याला ब्रेक लावणे अपेक्षित आहे. उद्योगाचे हे पाणी पिण्यासाठी आरक्षित करून यवतमाळकरांना अधिक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.

टॅग्स :Damधरण