शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

वाहतूक कोंडीतून सुटका करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:23 AM

शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस जीवघेणी होत चालली आहे. यावर कायम स्वरूपी तोडगा काढून शहरवासीयांना दिलासा द्यावा, .......

ठळक मुद्देप्रतिसाद फाऊंडेशन : जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस जीवघेणी होत चालली आहे. यावर कायम स्वरूपी तोडगा काढून शहरवासीयांना दिलासा द्यावा, यासाठी प्रतिसाद फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. वाहतुकीच्या दृष्टिकोनातून काही उपायही यात सुचविण्यात आले आहे.बसस्थानक चौकात पोलीस चौकी एका कडेला आहे. वाहतूक व्यवस्था चौकीत बसून हाताळली जाते. तांत्रिकदृष्ट्या दारव्हा व आर्णी रस्ता या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. वाहतूक पोलीस हजर राहिल्यास अपघात टाळले जाऊ शकतात. दारव्हा मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सची सतत ये-जा सुरू असते. ट्रॅव्हल्सचे चालक सिग्नल ओलांडेपावेतो धावत्या गाडीतूनच प्रवासी भरत नेतात. त्यामुळेही अपघात होतात. याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष आहे.आर्णी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाही खासगी बसेस एकेरी मार्गातून वाहन टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. या वाहनांचा मार्ग बायपासवरून केल्यास वाहतुकीची कोंडी होणार नाही. शहराबाहेरून वळण रस्त्याची सोय आहे. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळात जड वाहतूक थांबविल्यास अपघात टळू शकतात. बसस्थानक चौकातील सिग्नलचे टाईमर केवळ २२ सेकंद आहे. प्रत्येकजण आपले वाहन समोर काढण्याचे प्रमाण वाढले आहे. सिग्नलचे टाईमर वाढविले जावे.अनधिकृत पार्किंगच्या नावाखाली वाहन टोर्इंग करून नेले जाते. कायद्याप्रमाणे सूचना केल्यानंतरच वाहन टोर्इंग केले जावे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून उपाययोजना आखल्यास वाहतुकीच्या कोंडीतून शहरवासीयांची सुटका होऊ शकते, असे यावेळी सुचविण्यात आले.जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी या समस्येवर आठ-पंधरा दिवसात तोडगा काढला जाईल, असे सांगितले. यावेळी प्रतिसाद फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज गुल्हाने, प्रलय टिप्रमवार, विनोद नराये, अजय बोरेले, रवी माहुरकर, विनोद दोंदल, सचिन कावरे, राजेश इसाळकर, अनिल तांबेकर, गजानन राऊत, किशोर गावंडे, प्रकाश लांजेवार, शशी राय, शंकी यादव, शुभम संगीतराव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी