शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

गणेशोत्सव तोंडावर, तरीही यवतमाळात रस्त्यांची चाळणी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 21:58 IST

सर्वांना प्रतीक्षा असलेला गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. मात्र यावेळी रस्त्यांवरील खड्डे चुकवित गणरायाला आगमन करावे लागणार आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेच्या राजकारणात शहराची लागली वाट : गणरायाच्या आगमनात अडथळे, कार्यकर्त्यांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वांना प्रतीक्षा असलेला गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. मात्र यावेळी रस्त्यांवरील खड्डे चुकवित गणरायाला आगमन करावे लागणार आहे. कारण यवतमाळ शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळणी झाली आहे. नगरपरिषदेतील सत्ताधारी भाजपा-शिवसेनेच्या वर्चस्वाच्या राजकारणात शहराची पूर्णत: वाट लागली आहे. पालिकेत बांधकाम विभाग अस्तित्वात आहे की नाही, अशी शंका येऊ लागली आहे.यवतमाळात दुर्गोत्सवाचे महत्व असले तरी गणेशोत्सवही तेवढ्याच हर्षोल्हासात साजरा केला जातो. ग्रामीण भागातही अनेक सार्वजनिक मंडळांद्वारे गणेशाची स्थापना केली जाते. घरोघरीही श्री गणेश विराजमान होतात. दरवर्षी सार्वजनिक मंडळांची संख्या वाढते आहे. १३ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते या उत्सवाच्या तयारीलाही लागले आहे. परंतु त्यांना गणरायाचे आगमन कसे होणार याची चिंता भेडसावते आहे. कारण शहरातील रस्ते ठिकठिकाणी उखडले आहेत. कुठे जीवन प्राधिकरणाने तर कुठे दूरसंचार विभागाने रस्ते खोदले आहे. काही ठिकाणी विकास कामाच्या नावाखाली रस्त्यांचे खोदकाम झाले आहे. तर अनेक रस्त्यांवर कोणतेही कारण नसताना खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांसाठी त्या रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जा हे प्रमुख कारण ठरले आहे. अशा रस्ते व खड्ड्यांची संख्या अधिक आहे. विकास कामांसाठी खोदलेल्या रस्त्यांच्या आड हे भ्रष्टाचारामुळे पडलेले खड्डेही दडपण्याचा प्रयत्न होतो आहे. या खड्डेयुक्त रस्त्यांवरुनच गणरायाचे आगमन करावे लागणार का या चिंतेत कार्यकर्ते आहेत. हे खड्डे असेच राहिल्यास गणरायालासुद्धा हे खड्डे चुकवित आगमन करावे लागणार आहे. या खड्ड्यांमुळे दहा दिवस गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याचे आव्हान कार्यकर्त्यांपुढे राहणार आहे.या रस्त्यांवरील खड्ड्यांना यवतमाळ नगरपरिषदेचे राजकारण प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. नगराध्यक्ष शिवसेनेचे आहेत तर बहुमत भाजपाचे आहे. मोठी विकास कामे झाल्यास सेनेला श्रेय मिळेल म्हणून शक्य असेल तेथे अडथळे निर्माण करण्याचा व सेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा नगराध्यक्षांचा सूर आहे. तर नगराध्यक्षच विकास कामांमध्ये अडथळे आणत असल्याचा भाजपाचा आरोप आहे. मात्र या दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या राजकारणात यवतमाळकर नागरिकांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागतो आहे. शहराचे हृदयस्थळ असलेल्या दत्त चौकातच मुख्य मार्गाला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यावरून शहरातील अन्य मार्ग आणि नव्याने समाविष्ठ जुन्या ग्रामपंचायत क्षेत्रातील रस्त्यांची स्थिती काय असेल याची कल्पना येते.आधीच खड्डे त्यात पाऊस आल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. अनेकांच्या गाड्या स्लीप होऊन हातपाय फ्रॅक्चर झाले आहेत. खड्ड्यांमुळे अनेकांना पाठीचे, मणक्यांचे आजार वाढले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी अजूनही नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाकडून पाहिजे त्या गतीने प्रयत्न होताना दिसत नाही. पावसाळ्यात रस्त्यांची कामे करता येत नाहीत हा नियम आवर्जुन या विभागाकडून सांगितला जातो. खड्डे बुजविण्याच्या नावाखाली अनेक ठिकाणी लाल मुरुम टाकला गेला आहे. मात्र पावसात कुठे तो वाहून गेला तर बहुतांश ठिकाणी या मुरुमामुळे रस्त्याची स्थिती आणखी बिघडली आहे. मुरुमामुळे मोठ्या प्रमाणात वाहने कोलमडू लागली आहे. श्री गणरायाचे आगमन अशा खड्डेयुक्त रस्त्यांमधूनच करायचे काय? असा सवाल गणेशभक्तांकडून नगरपरिषदेला विचारला जात आहे.सर्वत्र भाजपाचीच सत्ता, तरीही वाताहतयवतमाळ पालिकेवर भाजपाची सत्ता आहे, शहराचे आमदार भाजपाचे आहे, आणखी त्यांच्याकडे राज्यमंत्री पद व पालकमंत्री पदही आहे. त्यानंतरही यवतमाळ शहर खड्डेमय झालेले पहावे लागत असेल तर या भाजपाच्या सत्तेचा यवतमाळकरांना उपयोग काय असा संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे.गणराया, पालिकेला खड्डे बुजविण्याची सद्बुद्धी द्याकिमान गणरायाच्या आगमनापूर्वी तरी हे खड्डे बुजविण्याची सद्बुद्धी यवतमाळ नगरपरिषदेचे पदाधिकारी, प्रशासन आणि विशेषत: बांधकाम विभागाला सूचते का? याकडे जनतेच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :BJPभाजपाYavatmalयवतमाळ