शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

अनेक जिल्ह्यात हळद, संत्रा पिकाचे मोठे नुकसान; अनिल देशमुख यांची सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 9:28 AM

माजी मंत्री अनिल देशमुख यांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हळद, संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने याच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना भरीव मदत सरकारने करावी अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली. अनिल देशमुख यांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

शेतकऱ्यांचे प्रश्न असताना दुःखाची अशी गोष्ट आहे की, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे राज्याच्या बाहेर प्रचाराच्या दौऱ्यासाठी व्यस्त आहे. अतिवृष्टीच्या पुराने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र अजून सुद्धा त्या पुराची पैसे शेतकऱ्यांना व नागरिकांना मिळाले नाही याची सुद्धा नुकसान भरपाई या जिल्ह्यामध्ये देण्यात यावी, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. 

मराठवाडा व विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड होते, मात्र कापसाला भाव मिळत नाही. कापसाची विदेशातून भारतामध्ये आयात करण्यात आले. आयात केल्याच्यानंतर ११ टक्के कॉटन ऑफ इंडिया असोसिएशनच्या दबावाखाली रद्द करण्यात आला. व्यापाराच्या फायद्यासाठी ११ टक्के आयात कमी करण्यात आला. त्यामुळे कापसाचे भाव कमी झाले कापसाची प्रदेशात निर्यात करण्यासाठी सरकार अपयशी ठरले, अशी टीका अनिल देशमुख यांनी केली. 

मागच्या वर्षी तरी आठ हजार रुपये कापसाला भाव मिळाला मात्र यावेळेस कापसाला भाव सात हजार रुपये आहे. उत्पादन खर्च जास्त आहे, त्याकडे सरकारचं लक्ष नाही कापसाला भाव नसल्याने अतिशय दुर्दैवी परिस्थिती शेतकऱ्यांची असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितले. आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचारी जे एक महिन्यापासून उपोषण करत आहे त्याच्याकडे सुद्धा राज्य शासनाने लक्ष देण्याची गरज आहे कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने जिल्ह्यामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, असं अनिल देशमुख यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी