शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

शेतकरी उद्घाटकाचा वर्षभरातच पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 6:00 AM

यवतमाळच्या संमेलनाला सुरुवातीला नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून जाहीर करण्यात आले. त्यांचे निमंत्रण नंतर वादात अडकले. ऐनवेळी वैशाली येडे (राजूर ता.कळंब) या शेतकरी विधवा महिलेला उद्घाटनाचा मान देण्यात आला. त्यावेळी येडे यांचे तडाखेबाज भाषणही प्रचंड गाजले होते.

ठळक मुद्देसाहित्य संमेलन : निमंत्रण नाही, साधा फोनही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या वर्षीच्या जानेवारीत यवतमाळात ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्यावेळी सामाजिक भान राखत साहित्यिकांनी जिल्ह्यातील एका आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवेला संमेलनाचे उद्घाटकपद बहाल करून पुरोगामी पाऊल उचलले होते. मात्र वर्षभरातच साहित्यिकांना त्या महिला उद्घाटकाचे विस्मरण झाले आहे. त्यामुळेच सध्या उस्मानाबादेत सुरू असलेल्या ९३ व्या संमेलनासाठी त्यांना निमंत्रण देणे तर दूरच साधा फोनही आला नाही.यवतमाळच्या संमेलनाला सुरुवातीला नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून जाहीर करण्यात आले. त्यांचे निमंत्रण नंतर वादात अडकले. ऐनवेळी वैशाली येडे (राजूर ता.कळंब) या शेतकरी विधवा महिलेला उद्घाटनाचा मान देण्यात आला. त्यावेळी येडे यांचे तडाखेबाज भाषणही प्रचंड गाजले होते. शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण महिलांचे खरे प्रश्न खऱ्या पोटतिडकीने मांडणाऱ्या वैशाली येडे यांना यंदा उस्मानाबादच्या मंचावर संधी मिळाली असती तर गेल्या एक वर्षातील प्रचंड वाढलेल्या शेती समस्येवरही त्यांनी जाब विचारला असता. मात्र यंदा त्यांना निमंत्रणच देण्यात आले नाही. याची येडे यांच्यासह संपूर्ण जिल्हावासीयांना खंत आहे.भेले असन थे...!मांगच्या वर्षी साहित्याच्या स्टेजवरून मी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते. मांगच्यावेळीच एवढा गजर केला तं यंदा काय गजर करीन असं वाटलं असनं. साहित्यिक लोकं भेले असन...!- वैशाली येडे, ९२ व्या अ.भा. साहित्य संमेलनाच्या उद्घाटक.

टॅग्स :agricultureशेती