शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
3
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
4
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
5
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
8
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
9
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
10
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
11
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
12
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
13
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
14
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
15
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

यवतमाळ जिल्ह्यांत वीज कोसळून 6 ठार, कळंब, राळेगाव आणि दारव्हा तालुक्यांतील घटनांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 4:54 PM

जिल्ह्यात गुरुवारी विजेच्या तांडवात पाच जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. राळेगाव तालुक्यातील वरणा, कळंब तालुक्यांतील आमला आणि दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे झालेल्या या घटनेत आई आणि मुलीसह शेतमजूर व शेतकरी ठार झाले.

यवतमाळ : जिल्ह्यात गुरुवारी विजेच्या तांडवात पाच जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. राळेगाव तालुक्यातील वरणा, कळंब तालुक्यांतील आमला आणि दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे झालेल्या या घटनेत आई आणि मुलीसह शेतमजूर व शेतकरी ठार झाले.चंदा शंकर रामगडे (६०), तेजस्वीनी शंकर रामगडे (२५), मधुकर पुरुषोत्तम ठोंबरे (३०) सर्व रा. आमला ता. कळंब, हेमंत श्रीकृष्ण थरकडे (२५) रा. पाभळ ता. दारव्हा आणि मंजुळा चंद्रभान राऊत (६५) रा. निमगव्हाण ता. कळंब, अशी मृतांची नावे आहे. तर सुमित्रा माणिकराव अंबाडारे (४२), विजय माणिक अंबाडारे, दिनू चंद्रभान राऊत हे जखमी झालेत. कळंब तालुक्यातील आमला येथील चंदा आणि तेजस्वीनी या मायलेकी मक्त्याने केलेल्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक वीज कोसळली. त्यात दोघेही जागीच ठार झाल्या. तर याच गावातील मधुकर ठोंबरे हा एका शेतात काम करीत असताना वीज कोसळून ठार झाला.राळेगाव आणि कळंब तालुक्याच्या सीमेवर असलेल्या निंबगव्हाण, वरणा शिवारात गुरुवारी दुपारी २ वाजता कापूस वेचण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक विजेचा कडकडाट होऊन वीज मजुरांच्या अंगावर पडली. त्यात मंजुळा राऊत जागीच ठार झाल्या. तर इतर तिघे जण जखमी झाले. अचानक वीज कोसळल्याने सर्वच जण बेशुद्ध पडले होते. काही वेळाने विजय अंबाडारे आणि दिनू राऊत यांना शुद्ध आली. पाहतात तर काय मंजुळाबाई ठार झालेल्या आणि सुमित्राबाई गंभीर जखमी होत्या. या जखमींना तत्काळ राळेगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून यवतमाळला हलविण्यात आले. तिसरी घटना दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे घडली. हेमंत श्रीकृष्ण थरकडे (२५) हा आपल्या स्वत:च्या शेतात कापूस वेचणीवर लक्ष ठेवण्यासाठी गेला होता. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अचानक अंगावर वीज कोसळली. त्यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत प्रथम लोणी आणि नंतर आर्णी येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी हेमंतला मृत घोषित केले.