शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

यवतमाळसह पाच विमानतळ १५ वर्षांनंतर पुन्हा एमआयडीसीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:40 IST

अखेर रिलायन्सच्या विळख्यातून सुटका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सामंत यांचा धाडसी निर्णय

विशाल सोनटक्के लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगाने विकास व वापराबाबत पंधरा वर्षे कुजविलेले राज्यातील यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव व बारामती हे पाच विमानतळ अखेर मंगळवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने अंमलात आणला. आता इतर विमानतळांप्रमाणेच हे विमानतळही नवी कात टाकतील, अशी आशा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने या विमानतळांभोवतीचा फास अखेर सुटला आहे. मंगळवारी एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रिलायन्सकडून या विमानतळांच्या एमआयडीसीकडे हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली.

आधुनिकीकरण व विस्ताराच्या अपेक्षेने राज्य सरकारने यवतमाळचे जवाहरलाल दर्डा विमानतळ अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाकडे दिले होते. परंतु रिलायन्सने हे सुरू असलेले विमानतळ बंद पाडले. विस्तार सोडा परंतु अक्षरशः विमानतळाचे वाटोळे केले. अशीच अवस्था राज्यातील इतर चार विमानतळांचीही झाली. या प्रकारामुळे औद्योगिकरणालाही मोठी खीळ बसली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयक्षमतेमुळे आता या विमानतळासह राज्यातील लातूर, नांदेड, धाराशिव व बारामती ही पाच परत एमआयडीसीकडे आले आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांनी उद्योगमंत्री असताना मागास जिल्ह्यांमध्ये उद्योग-व्यवसायांना गती मिळावी, तसेच रोजगाराच्या संधी वाढाव्यात, विमानतळ उभारणीचे धोरण आणले. त्यातूनच कापसाची पंढरी असलेल्या यवतमाळ येथे विमानतळाची उभारणी झाली. रेमंडसारखा मोठा उद्योग ही त्या पुढाकाराची पहिली फलश्रुती होती. मात्र, २००९ मध्ये यवतमाळ, लातूर, नांदेड, धाराशिव व बारामती ही पाच विमानतळे ६३ कोटींच्या बोलीत अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एअरपोर्ट डेव्हल्पमेंटकडे सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर या विमानतळांची दुर्दशा झाली. विकासाला खीळ बसली. त्यामुळे हे विमानतळ रिलायन्सकडून काढून घेऊन पूर्ववत एमआयडीसीकडे सोपवावे, अशी मागणी होत राहिली. राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी सातत्याने लावून धरली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही पुढाकार घ्यावा, यासाठी प्रयत्न झाले. या अनुषंगाने एमआयडीसीने रिलायन्स कंपनीला तीन वेळा नोटीस बजावली. मात्र, रिलायन्सकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मंगळवारी हे सर्व पाच विमानतळ रिलायन्सकडून पुःनश्च एमआयडीसीकडे हस्तांतरित करून घेण्यात आले. यवतमाळ येथे याप्रसंगी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ए. बी. दाभेराव, प्रादेशिक अधिकारी स्नेहा पिंपरीकर-नंद, प्रमुख भूमापक जी. एस. बारसकर यांच्यासह पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जागेचे मोजमाप करून पंचनामा झाल्यानंतर एमआयडीसीने विमानतळाचा ताबा घेतला.

आता पूर्ण क्षमतेने विमानतळ कार्यान्वित व्हावे - डॉ. दर्डारिलायन्स समूहाकडून विमानतळ काढून घेण्याच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांना धन्यवाद देत लोकमत' एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या मागणीनुसार तातडीने हालचाली करून सरकारने हे विमानतळ पुःनश्च एमआयडीसीकडे घेतले आणि या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळकरांना दिलेली ही मोठी भेट आहे. या निर्णयामुळे यवतमाळच्या औद्योगिक विकासाचा मार्ग प्रशस्त झाला असून आता हे विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. धावपट्टी आणखी वाढविल्यास यवतमाळ येथेही बोइंगसारखी मोठी विमाने सहज उतरू alaugh शकतील. तेव्हा, धावपट्टी वाढवावी तसेच नाईट लॅन्डिंगची सुविधा उपलब्ध करून पूर्ण क्षमतेने हे विमानतळ कार्यान्वित करावे, असे डॉ. विजय दर्डा म्हणाले.

टॅग्स :YavatmalयवतमाळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUday Samantउदय सामंतAirportविमानतळ