शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोवंश कायद्याने शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात

By admin | Updated: July 30, 2016 00:59 IST

राज्य शासनाने गोवंश हत्त्याबंदीचा कायदा केल्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे,

रघुनाथदादा पाटील : पुसद येथील बैठकीत सरकारवर टीका पुसद : राज्य शासनाने गोवंश हत्त्याबंदीचा कायदा केल्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे, अशी जोरदार टीका शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली. गुरुवारी २८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता स्थानिक विश्रामगृहात आयोजित शेतकरी संघटना व कुरेशी समाज संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले की, सरकारने गोवंश हत्त्याबंदी वन्यजीव संरक्षण कायदा करून शेतकरी उद्ध्वस्त केले आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नगदी पशुधन असलेले बैल, म्हैस, गाय अशा जनावरांना खरेदीदार उरलेला नाही. भाकड जनावरांचे काय करायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कुरेशी समाजाच्या हातांना काम न राहिल्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बैठकीच्या आयोजनामागची भूमिका विषद करताना शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दिनकर दाभाडे म्हणाले की, भाजप सरकार जनतेचे व्यवसाय स्वातंत्र्य हिसकावून घेवून त्यांच्यावर खाण्यापिण्यापासून बंधने आणत आहे. ९ आॅगस्ट रोजी अमरावती विभागीय कार्यालयावर आयोजित मोर्चा व धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. गोवंश हत्त्याबंदी कायद्याकडे भावनात्मकदृष्टीने न पाहता अर्थकारणाच्या दृष्टीने पाहावे, असे संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपटे म्हणाले. पशुधन बाजारात विकलेच जात नसेल तर शेतकरी त्यांची पैदास तरी कशाला करेल? त्यामुळे देशातील पशुधन घटण्याचा धोका निर्माण होणार आहे, असे त्यांनी सांगितले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड.सुभाष खंडागळे होते. संजय पौगाळे, गफ्फार कुरेशी आदींसह शेकडो शेतकरी कुरेशी, समाजाचे लोक उपस्थित होते. रघुनाथदादा पाटील, कालिदास आपटे, दिनकर दाभाडे यांचा कुरेशी समाज संघटनेच्यावतीने यावेळी सत्कार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)