शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

सत्ता स्थापनेसाठी सर्वच पर्यायांची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 6:00 AM

जिल्हा परिषदेत सर्वाधिक २० सदस्य शिवसेनेकडे आहे. मात्र अडीच वर्षांपूर्वी भाजपने शिवसेनेला पछाडून काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत संधान साधले. यात तीन पक्षांनी अपक्षांसह सत्ता स्थापन केली होती. चार महिन्यांपूर्वी राज्यात शिवसेना व भाजपची युती झाल्याने दोन सभापतींवर अविश्वास आणला गेला. त्यानंतर शिवसेनेने दोन पदांवर बाजी मारली.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : युती, महाविकास आघाडीचे घोडे तबेल्यातच, ३१ चा मॅजिक फिगर जुळविण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्हा परिषदेतही तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली जाईल, असे सांगितले जात होते. मात्र विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपण्यास अवघे आठ दिवस उरले असतानाही जिल्हा परिषदेत नेमकी कुणाची सत्ता स्थापन होईल, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.जिल्हा परिषदेत सर्वाधिक २० सदस्य शिवसेनेकडे आहे. मात्र अडीच वर्षांपूर्वी भाजपने शिवसेनेला पछाडून काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत संधान साधले. यात तीन पक्षांनी अपक्षांसह सत्ता स्थापन केली होती. चार महिन्यांपूर्वी राज्यात शिवसेना व भाजपची युती झाल्याने दोन सभापतींवर अविश्वास आणला गेला. त्यानंतर शिवसेनेने दोन पदांवर बाजी मारली. सध्या सर्वच पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या सदस्यांमध्ये सत्तेची खुमखुमी दिसत आहे. आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्याने जिल्हा परिषदेत तोच कित्ता गिरवला जाण्याची शक्यता आहे.२० डिसेंबरनंतर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. सत्तेसाठी पक्षांमध्ये घमासान सुरू झाले आहे. कोणत्याही स्थितीत सत्ता स्थापन करण्याचा पर्याय सर्वच पक्षांनी खुला ठेवला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केल्यास पदांच्या वाटणीवरून कलह होण्याची शक्यता आहे.काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन पदांची मागणी केल्याचे सांगितले जाते. मात्र शिवसेना या दोन पक्षांना चार पदे देण्यास तयार नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महाविकास आघाडीत कुरबुर होण्याची शक्यता बळावली आहे. दुसरीकडे भाजपनेही अद्याप आशा सोडली नाही. भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने कोणत्याही स्थितीत सत्ता स्थापन करण्यासाठी घडामोडी सुरू केल्या आहे. ऐनवेळी शिवसेना आणि भाजपचीही युती होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेबाहेर राहावे लागू शकते. काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रितपणे जादा पदांची मागणी केल्यास शिवसेना आणि भाजपसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.निवडीची तारीख अद्याप निश्चित नाहीविद्यमान पदाधिकाऱ्यांचा वाढीव १२० दिवसांचा कार्यकाळ येत्या २० डिसेंबरला संपणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे पदाधिकाऱ्यांची निवडणूक घेण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश शासनाचे उपसचिव र.आ. नागरगोजे यांनी दिले आहे. मात्र त्या पत्रात निश्चित तारखेचा उल्लेख नाही. त्यामुळे २० डिसेंबरनंतर निवडणूक निर्णय अधिकारी नोटीस काढण्याची शक्यता आहे. नोटीस निघाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे अद्यापही नवीन पदाधिकाºयांच्या निवडीची तारीख निश्चित नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका