शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दररोज शेकडो बेरोजगार परततात रिकाम्या हाताने; एमआयडीसीत निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 18:24 IST

Yavatmal : साडेसहाशे हेक्टरवरील एमआयडीसीत केवळ चार हजार बेरोजगारांना रोजगार

रुपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : सुशिक्षीत बेरोजगारांना मोठ्या शहराकडे रोजगारासाठी जाण्याचे कामच पडू नये म्हणून यवतमाळात औद्योगिक वसाहत उभारण्यात आली. तब्बल ६४५ हेक्टरवर असलेल्या या वसाहतीत मोजकेच उद्योग सुरू आहेत. त्यातील दोन मोठे उद्योग सोडले तर इतर उद्योगात केवळ तीन ते चार हजार बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. दररोज अनेक बेरोजगार तरुण औद्योगिक वसाहतीत कामाच्या शोधासाठी येतात. मात्र त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते.

जुनी औद्योगिक वसाहत २०५ हेक्टरवर उभारलेली आहे. ही जागा अपुरी पडल्याने अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी ४३९ हेक्टरवरील जागा नव्याने मंजूर झाली. अशा ६४५.५६ हेक्टरवर ही औद्योगिक वसाहत उभी आहे. यावर २५२ युनिट आहेत. त्यातील अर्धे अधिक युनिट बंद आहेत. अर्धे युनिट सुरू असले तरी रेमंड आणि सुतगिरणी हे मोठे प्रकल्प वगळल्यास रोजगाराचे अपेक्षित उद्दिष्ठ गाठण्यास ही वसाहत अपयशी ठरल्याचे दिसते. 

जिनिंग प्रेसिंग, ऑइल मिल, दालमिल, कार्डबोर्ड, ट्रान्सफार्मर फॅक्टरी, प्लास्टिक कॅरी फॅक्टरी, फरसाण युनिट, डेअरी युनिट, मुरमुरा युनिट, एचडीपीई पाइप, पीव्हीसी पाइप, फ्लाय अॅश ब्रिक फॅक्टरी, कृषी अवजारे आणि स्पिनिंग मिल या ठिकाणी साधारण चार हजार कर्मचारी काम करीत असून त्यात महिला कामगारांचे प्रमाण २० टक्के आहे. 

या ठिकाणी रोजगाराच्या शोधात आलेले सुशिक्षित बेरोजगार तरुण अनेकवेळा काम न मिळाल्याने परततात. उच्च शिक्षित तरुणांच्या हाताला या ठिकाणी काम मिळत नाही. मोजक्याच उच्च शिक्षित तरुणांना या ठिकाणी काम मिळाले आहे. मात्र, लाखावर उच्च शिक्षित तरुण आजही कामाच्या प्रतीक्षेत आहे. शहरासह लगतच्या गावातील आणि जिल्ह्यातील इतर भागातून आलेले तरुण या ठिकाणी रोजगार लेबर वर्क म्हणून काम करतात. त्यांना ३०० ते ६०० रुपयापर्यंतचा रोजगार मिळतो. काही सुशिक्षित बेरोजगार उधडे काम घेतात. मात्र, हे कामदेखील हंगामी असते. यातून हंगाम संपल्यावर अनेकांच्या हातचा रोजगार जातो. त्यांना पुन्हा दूसऱ्या कामाचा शोध घ्यावा लागतो. 

तरुण म्हणतात... "मजुरांच्या मजुरीचे दर कमी आहेत. यासाठी स्थानिक पातळीवर मोठे उद्योग आवश्यक आहेत. आम्ही कुठेही काम करण्यासाठी तयार आहोत. स्थानिक पातळीवर मोठे उद्योग आले तर त्याचा लाभ होईल. स्किलनुसार रोजगार मिळेल." - शेख अनिस

"मी आयटीआय केला. मात्र, या ठिकाणी लेथ मशिनवरचे काम उपलब्ध नाही. यामुळे मिळेल ते काम करून रोजगार मिळवितो. अनेक आयटीआय झालेले तरुण रोजगाराच्या शोधात बाहेर जातात. या ठिकाणी रोजगार मिळाला तर प्रत्येकाला फायदा हाईल." - वसंत भारकर

"मी आयटीआयमधून शिक्षण केले, रोजगार मिळावा, हा मुख्य उद्देश होता. मात्र, स्थानिक पातळीवर काम नाही. मोठ्या शहरात राहण्याचा आणि जेवणाचा खर्च वाढतो. यामुळे याच ठिकाणी काम करीत आहे. माझ्या बॅचचे अनेक तरुण रोजगार न मिळाल्याने बाहेर जिल्ह्यात गेले आहेत." - जीवन चव्हाण

"आता कापसाचा हंगाम आहे. म्हणून उधडे काम आम्ही घेतो. यात कामानुसार पैसे असतात. अशा स्वरुपाचे काम बारमाही उपलब्ध राहिले तर त्याचा कामगारांना फायदा होतो. यासाठी नवे उद्योग यायला हवेत." - लक्ष्मण पत्रे

टॅग्स :MIDCएमआयडीसीUnemploymentबेरोजगारीnagpurनागपूर