शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
3
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
4
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
5
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
6
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
7
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
8
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
9
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
10
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
11
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
12
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
13
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
14
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
15
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
16
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
17
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
18
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
19
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
20
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल

दररोज शेकडो बेरोजगार परततात रिकाम्या हाताने; एमआयडीसीत निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 18:24 IST

Yavatmal : साडेसहाशे हेक्टरवरील एमआयडीसीत केवळ चार हजार बेरोजगारांना रोजगार

रुपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : सुशिक्षीत बेरोजगारांना मोठ्या शहराकडे रोजगारासाठी जाण्याचे कामच पडू नये म्हणून यवतमाळात औद्योगिक वसाहत उभारण्यात आली. तब्बल ६४५ हेक्टरवर असलेल्या या वसाहतीत मोजकेच उद्योग सुरू आहेत. त्यातील दोन मोठे उद्योग सोडले तर इतर उद्योगात केवळ तीन ते चार हजार बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. दररोज अनेक बेरोजगार तरुण औद्योगिक वसाहतीत कामाच्या शोधासाठी येतात. मात्र त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते.

जुनी औद्योगिक वसाहत २०५ हेक्टरवर उभारलेली आहे. ही जागा अपुरी पडल्याने अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी ४३९ हेक्टरवरील जागा नव्याने मंजूर झाली. अशा ६४५.५६ हेक्टरवर ही औद्योगिक वसाहत उभी आहे. यावर २५२ युनिट आहेत. त्यातील अर्धे अधिक युनिट बंद आहेत. अर्धे युनिट सुरू असले तरी रेमंड आणि सुतगिरणी हे मोठे प्रकल्प वगळल्यास रोजगाराचे अपेक्षित उद्दिष्ठ गाठण्यास ही वसाहत अपयशी ठरल्याचे दिसते. 

जिनिंग प्रेसिंग, ऑइल मिल, दालमिल, कार्डबोर्ड, ट्रान्सफार्मर फॅक्टरी, प्लास्टिक कॅरी फॅक्टरी, फरसाण युनिट, डेअरी युनिट, मुरमुरा युनिट, एचडीपीई पाइप, पीव्हीसी पाइप, फ्लाय अॅश ब्रिक फॅक्टरी, कृषी अवजारे आणि स्पिनिंग मिल या ठिकाणी साधारण चार हजार कर्मचारी काम करीत असून त्यात महिला कामगारांचे प्रमाण २० टक्के आहे. 

या ठिकाणी रोजगाराच्या शोधात आलेले सुशिक्षित बेरोजगार तरुण अनेकवेळा काम न मिळाल्याने परततात. उच्च शिक्षित तरुणांच्या हाताला या ठिकाणी काम मिळत नाही. मोजक्याच उच्च शिक्षित तरुणांना या ठिकाणी काम मिळाले आहे. मात्र, लाखावर उच्च शिक्षित तरुण आजही कामाच्या प्रतीक्षेत आहे. शहरासह लगतच्या गावातील आणि जिल्ह्यातील इतर भागातून आलेले तरुण या ठिकाणी रोजगार लेबर वर्क म्हणून काम करतात. त्यांना ३०० ते ६०० रुपयापर्यंतचा रोजगार मिळतो. काही सुशिक्षित बेरोजगार उधडे काम घेतात. मात्र, हे कामदेखील हंगामी असते. यातून हंगाम संपल्यावर अनेकांच्या हातचा रोजगार जातो. त्यांना पुन्हा दूसऱ्या कामाचा शोध घ्यावा लागतो. 

तरुण म्हणतात... "मजुरांच्या मजुरीचे दर कमी आहेत. यासाठी स्थानिक पातळीवर मोठे उद्योग आवश्यक आहेत. आम्ही कुठेही काम करण्यासाठी तयार आहोत. स्थानिक पातळीवर मोठे उद्योग आले तर त्याचा लाभ होईल. स्किलनुसार रोजगार मिळेल." - शेख अनिस

"मी आयटीआय केला. मात्र, या ठिकाणी लेथ मशिनवरचे काम उपलब्ध नाही. यामुळे मिळेल ते काम करून रोजगार मिळवितो. अनेक आयटीआय झालेले तरुण रोजगाराच्या शोधात बाहेर जातात. या ठिकाणी रोजगार मिळाला तर प्रत्येकाला फायदा हाईल." - वसंत भारकर

"मी आयटीआयमधून शिक्षण केले, रोजगार मिळावा, हा मुख्य उद्देश होता. मात्र, स्थानिक पातळीवर काम नाही. मोठ्या शहरात राहण्याचा आणि जेवणाचा खर्च वाढतो. यामुळे याच ठिकाणी काम करीत आहे. माझ्या बॅचचे अनेक तरुण रोजगार न मिळाल्याने बाहेर जिल्ह्यात गेले आहेत." - जीवन चव्हाण

"आता कापसाचा हंगाम आहे. म्हणून उधडे काम आम्ही घेतो. यात कामानुसार पैसे असतात. अशा स्वरुपाचे काम बारमाही उपलब्ध राहिले तर त्याचा कामगारांना फायदा होतो. यासाठी नवे उद्योग यायला हवेत." - लक्ष्मण पत्रे

टॅग्स :MIDCएमआयडीसीUnemploymentबेरोजगारीnagpurनागपूर