शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

दररोज शेकडो बेरोजगार परततात रिकाम्या हाताने; एमआयडीसीत निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 18:24 IST

Yavatmal : साडेसहाशे हेक्टरवरील एमआयडीसीत केवळ चार हजार बेरोजगारांना रोजगार

रुपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : सुशिक्षीत बेरोजगारांना मोठ्या शहराकडे रोजगारासाठी जाण्याचे कामच पडू नये म्हणून यवतमाळात औद्योगिक वसाहत उभारण्यात आली. तब्बल ६४५ हेक्टरवर असलेल्या या वसाहतीत मोजकेच उद्योग सुरू आहेत. त्यातील दोन मोठे उद्योग सोडले तर इतर उद्योगात केवळ तीन ते चार हजार बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. दररोज अनेक बेरोजगार तरुण औद्योगिक वसाहतीत कामाच्या शोधासाठी येतात. मात्र त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते.

जुनी औद्योगिक वसाहत २०५ हेक्टरवर उभारलेली आहे. ही जागा अपुरी पडल्याने अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी ४३९ हेक्टरवरील जागा नव्याने मंजूर झाली. अशा ६४५.५६ हेक्टरवर ही औद्योगिक वसाहत उभी आहे. यावर २५२ युनिट आहेत. त्यातील अर्धे अधिक युनिट बंद आहेत. अर्धे युनिट सुरू असले तरी रेमंड आणि सुतगिरणी हे मोठे प्रकल्प वगळल्यास रोजगाराचे अपेक्षित उद्दिष्ठ गाठण्यास ही वसाहत अपयशी ठरल्याचे दिसते. 

जिनिंग प्रेसिंग, ऑइल मिल, दालमिल, कार्डबोर्ड, ट्रान्सफार्मर फॅक्टरी, प्लास्टिक कॅरी फॅक्टरी, फरसाण युनिट, डेअरी युनिट, मुरमुरा युनिट, एचडीपीई पाइप, पीव्हीसी पाइप, फ्लाय अॅश ब्रिक फॅक्टरी, कृषी अवजारे आणि स्पिनिंग मिल या ठिकाणी साधारण चार हजार कर्मचारी काम करीत असून त्यात महिला कामगारांचे प्रमाण २० टक्के आहे. 

या ठिकाणी रोजगाराच्या शोधात आलेले सुशिक्षित बेरोजगार तरुण अनेकवेळा काम न मिळाल्याने परततात. उच्च शिक्षित तरुणांच्या हाताला या ठिकाणी काम मिळत नाही. मोजक्याच उच्च शिक्षित तरुणांना या ठिकाणी काम मिळाले आहे. मात्र, लाखावर उच्च शिक्षित तरुण आजही कामाच्या प्रतीक्षेत आहे. शहरासह लगतच्या गावातील आणि जिल्ह्यातील इतर भागातून आलेले तरुण या ठिकाणी रोजगार लेबर वर्क म्हणून काम करतात. त्यांना ३०० ते ६०० रुपयापर्यंतचा रोजगार मिळतो. काही सुशिक्षित बेरोजगार उधडे काम घेतात. मात्र, हे कामदेखील हंगामी असते. यातून हंगाम संपल्यावर अनेकांच्या हातचा रोजगार जातो. त्यांना पुन्हा दूसऱ्या कामाचा शोध घ्यावा लागतो. 

तरुण म्हणतात... "मजुरांच्या मजुरीचे दर कमी आहेत. यासाठी स्थानिक पातळीवर मोठे उद्योग आवश्यक आहेत. आम्ही कुठेही काम करण्यासाठी तयार आहोत. स्थानिक पातळीवर मोठे उद्योग आले तर त्याचा लाभ होईल. स्किलनुसार रोजगार मिळेल." - शेख अनिस

"मी आयटीआय केला. मात्र, या ठिकाणी लेथ मशिनवरचे काम उपलब्ध नाही. यामुळे मिळेल ते काम करून रोजगार मिळवितो. अनेक आयटीआय झालेले तरुण रोजगाराच्या शोधात बाहेर जातात. या ठिकाणी रोजगार मिळाला तर प्रत्येकाला फायदा हाईल." - वसंत भारकर

"मी आयटीआयमधून शिक्षण केले, रोजगार मिळावा, हा मुख्य उद्देश होता. मात्र, स्थानिक पातळीवर काम नाही. मोठ्या शहरात राहण्याचा आणि जेवणाचा खर्च वाढतो. यामुळे याच ठिकाणी काम करीत आहे. माझ्या बॅचचे अनेक तरुण रोजगार न मिळाल्याने बाहेर जिल्ह्यात गेले आहेत." - जीवन चव्हाण

"आता कापसाचा हंगाम आहे. म्हणून उधडे काम आम्ही घेतो. यात कामानुसार पैसे असतात. अशा स्वरुपाचे काम बारमाही उपलब्ध राहिले तर त्याचा कामगारांना फायदा होतो. यासाठी नवे उद्योग यायला हवेत." - लक्ष्मण पत्रे

टॅग्स :MIDCएमआयडीसीUnemploymentबेरोजगारीnagpurनागपूर