शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक ड्युटीसाठी कर्मचाऱ्यांची नकारघंटा, काहींना यश

By admin | Updated: April 19, 2015 02:11 IST

ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी उणेपुरे चार दिवस उरले आहे. निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

नेर : ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी उणेपुरे चार दिवस उरले आहे. निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांना या कामगिरीवर नियुक्त केले जात आहे. मात्र काही लोकांकडून या ड्युटीसाठी नकारघंटा सुरू आहे. यात शिक्षकवर्ग आघाडीवर आहे. अधिकाऱ्यांनी लावलेली ड्यूटी काहीही करून रद्द करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. यात काही जण यशस्वीही झाले आहेत. ही बाब अधिकारी वर्गांसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे.तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींची निवडणूक पहिल्या टप्प्यात २२ एप्रिल रोजी होत आहे. यासाठी पोलीस, महसूल, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावली जात आहे. यात शिक्षकांचाही समावेश आहे. इतर विभागातील कर्मचारी ही ड्यूटी करण्यास तत्पर असले तरी शिक्षकांकडून मात्र नाक मुरडले जात आहे. सुरुवातीला तर ही ड्यूटी नकोच असा पवित्रा त्यांनी घेतला. मात्र संबंधित विभागाने त्यांना आदेश दिल्यानंतर वशिला लावून ड्यूटी रद्द करून घेतली. काहींनी तर वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून यापासून दूर जाण्यात ते यशस्वी झाले.काही लोकांनी गावातील पुढाऱ्यांचीही मदत घेणे सुरू केले आहे. असे काही महाभाग या शिक्षकांच्या मदतीसाठी धावले आहे. त्यांच्या चकरा महसूल कार्यालयात वाढल्या आहेत. जिल्हा पातळीवरील राजकीय नेत्यांकडूनही वशिला लावण्यात काही जण मागे नाहीत. या प्रकारात प्रामाणिकपणे ड्यूटीवर जाण्यास तयार असलेल्या शिक्षकांवर मात्र अन्याय होत आहे. शिवाय संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी ही बाब डोकेदुखी ठरत आहे. निवडणूक ड्यूटीवर कार्यरत असताना झालेली चूक नोकरीवर गदा आणणारी ठरू शकते. या भीतीपोटीच अनेकांनी यापासून कुठल्याही प्रकारे प्रयत्न करून दूर राहण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)