शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

सात महिन्यांत आठ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: July 28, 2016 01:10 IST

शेतकरी आत्महत्या थोपविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी शेतकरी आत्महत्याचे सत्र मात्र थांबायला तयार नाही.

अभियान कुचकामी : बँका धरताहेत वेठीस महागाव : शेतकरी आत्महत्या थोपविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी शेतकरी आत्महत्याचे सत्र मात्र थांबायला तयार नाही. गत सात महिन्यात महागाव तालुक्यात आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. बळीराजा चेतना अभियान आणि अन्न सुरक्षा योजनाही तालुक्यात कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. महागाव तालुक्यात तीन वर्षांपासून दुष्काळाचे सावट आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. अशा शेतकऱ्यांमध्ये आत्मसन्मान दाखविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविले जात आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे सांगितले जात आहे. तसेच अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गहू, तांदूळ अत्यल्प दरात दिले जाते. परंतु आजही महागाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचला नाही. परिणामी जानेवारी ते जुलै या सात महिन्यात आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्यांची कारणे शोधली असता धक्कादायक वास्तव पुढे आले. अपवाद वगळता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरात डाळदाणा आढळून आला नाही. शेतातील पिकांच्या फवारणीसाठी पैसा नाही. सावकाराचे कर्ज अंगावर असणे, बँका कर्ज द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून येते. महागाव तालुक्यातील पिंपळगाव येथील किसन भागोराव नरवाडे या शेतकऱ्याने पंतप्रधानांकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली होती. पूर्वीचे कर्ज वसूल करून घेतल्यानंतर बँक कर्जाचे पुनर्गठन करायला तयार नाही. त्यामुळे खचून गेलेल्या किसनने इच्छा मरणाची मागितली होती. शासकीय यंत्रणा प्रभावीपणे काम करीत नसल्याचे दिसत आहे. शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी तालुक्याला तीनदा भेटी देवून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. परंतु त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी विविध उपाययोजना तालुक्यात फेल ठरल्याचे दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)