शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

सात महिन्यांत आठ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: July 28, 2016 01:10 IST

शेतकरी आत्महत्या थोपविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी शेतकरी आत्महत्याचे सत्र मात्र थांबायला तयार नाही.

अभियान कुचकामी : बँका धरताहेत वेठीस महागाव : शेतकरी आत्महत्या थोपविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी शेतकरी आत्महत्याचे सत्र मात्र थांबायला तयार नाही. गत सात महिन्यात महागाव तालुक्यात आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. बळीराजा चेतना अभियान आणि अन्न सुरक्षा योजनाही तालुक्यात कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. महागाव तालुक्यात तीन वर्षांपासून दुष्काळाचे सावट आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. अशा शेतकऱ्यांमध्ये आत्मसन्मान दाखविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविले जात आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे सांगितले जात आहे. तसेच अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गहू, तांदूळ अत्यल्प दरात दिले जाते. परंतु आजही महागाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचला नाही. परिणामी जानेवारी ते जुलै या सात महिन्यात आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्यांची कारणे शोधली असता धक्कादायक वास्तव पुढे आले. अपवाद वगळता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरात डाळदाणा आढळून आला नाही. शेतातील पिकांच्या फवारणीसाठी पैसा नाही. सावकाराचे कर्ज अंगावर असणे, बँका कर्ज द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून येते. महागाव तालुक्यातील पिंपळगाव येथील किसन भागोराव नरवाडे या शेतकऱ्याने पंतप्रधानांकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली होती. पूर्वीचे कर्ज वसूल करून घेतल्यानंतर बँक कर्जाचे पुनर्गठन करायला तयार नाही. त्यामुळे खचून गेलेल्या किसनने इच्छा मरणाची मागितली होती. शासकीय यंत्रणा प्रभावीपणे काम करीत नसल्याचे दिसत आहे. शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी तालुक्याला तीनदा भेटी देवून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. परंतु त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी विविध उपाययोजना तालुक्यात फेल ठरल्याचे दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)