शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

सात महिन्यांत आठ शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: July 28, 2016 01:10 IST

शेतकरी आत्महत्या थोपविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी शेतकरी आत्महत्याचे सत्र मात्र थांबायला तयार नाही.

अभियान कुचकामी : बँका धरताहेत वेठीस महागाव : शेतकरी आत्महत्या थोपविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी शेतकरी आत्महत्याचे सत्र मात्र थांबायला तयार नाही. गत सात महिन्यात महागाव तालुक्यात आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. बळीराजा चेतना अभियान आणि अन्न सुरक्षा योजनाही तालुक्यात कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. महागाव तालुक्यात तीन वर्षांपासून दुष्काळाचे सावट आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. अशा शेतकऱ्यांमध्ये आत्मसन्मान दाखविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविले जात आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे सांगितले जात आहे. तसेच अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गहू, तांदूळ अत्यल्प दरात दिले जाते. परंतु आजही महागाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचला नाही. परिणामी जानेवारी ते जुलै या सात महिन्यात आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्यांची कारणे शोधली असता धक्कादायक वास्तव पुढे आले. अपवाद वगळता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरात डाळदाणा आढळून आला नाही. शेतातील पिकांच्या फवारणीसाठी पैसा नाही. सावकाराचे कर्ज अंगावर असणे, बँका कर्ज द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून येते. महागाव तालुक्यातील पिंपळगाव येथील किसन भागोराव नरवाडे या शेतकऱ्याने पंतप्रधानांकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली होती. पूर्वीचे कर्ज वसूल करून घेतल्यानंतर बँक कर्जाचे पुनर्गठन करायला तयार नाही. त्यामुळे खचून गेलेल्या किसनने इच्छा मरणाची मागितली होती. शासकीय यंत्रणा प्रभावीपणे काम करीत नसल्याचे दिसत आहे. शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी तालुक्याला तीनदा भेटी देवून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. परंतु त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी विविध उपाययोजना तालुक्यात फेल ठरल्याचे दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)