शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पुसद शहरात लॉकडाऊनच्या काळात भूजल संरक्षण कायद्याला तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

भूजल सर्वेक्षण कायद्यानुसार नागरिकांना विहीर, कूपनलिका खोदायची असल्यास शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. ही परवानगी देताना संबंधित यंत्रणा त्या लगतचा परिसर कोरडा होणार नाही, याची दक्षता घेते. शासनाने ठरविलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार परवानगी दिली जाते. यात विशिष्ट अंतराच्या आत दुसऱ्या विहीर व कूपनलिकेला परवानगी मिळत नाही.

ठळक मुद्देबोअरसाठी ५०० फूट खोदकाम । नगरपरिषद व संबंधित विभागाचे दुर्लक्ष

प्रकाश लामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहर व तालुक्यात पारा ४३ ते ४५ अंशावर पोहोचला आहे. यामुळे भूगर्भातील पाणीपातळी खोल जात आहे. परिणामी शहर व तालुक्यात सर्वत्र बोअर मारण्याचा सपाटा सुरू आहे. त्यासाठी ५०० फुटापर्यंत खोदकाम केले जात आहे. यात भूजल संरक्षण कायद्याला तिलांजली दिली जात असताना बोअरचालकांवर कोणतीही कारवाई होत नाही.भूजल सर्वेक्षण कायद्यानुसार नागरिकांना विहीर, कूपनलिका खोदायची असल्यास शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. ही परवानगी देताना संबंधित यंत्रणा त्या लगतचा परिसर कोरडा होणार नाही, याची दक्षता घेते. शासनाने ठरविलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार परवानगी दिली जाते. यात विशिष्ट अंतराच्या आत दुसऱ्या विहीर व कूपनलिकेला परवानगी मिळत नाही. मात्र कोरोना संकटाच्या काळात शहर व तालुक्यात बोअर खोदकामाला जोर आला आहे. भूजल सर्वेक्षणाच्या नियमांना तिलांजली देत बोअर मशीनचालक वाटेल तेवढे खोदकाम करीत आहे. शासनाकडून परवानगी घेण्याची जबाबदारी आमची नसल्याचे सांगून त्यांची मनमानी सुरू आहे.जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्याने शहर व तालुक्यातील अनेक नागरिक आणि शेतकरी बोअर मारतात. पाणी लागण्याची खात्री असलेल्या ठिकाणीच बोअर मारले जाते. तथापि त्या जागेची भूजल सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांकडून तपासणी होणे गरजेचे असते. त्याला बगल देत बोअरचालक मनमानीपणे खोदकाम करीत आहे. शहर व तालुक्यातील अनेक गावात हा धिंगाणा सुरू आहे. अनेकदा रात्री खोदकाम होत असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे. अनेक ठिकाणी चक्क ५०० फुटापर्यंत खोदकाम केले जात आहे. वास्तविक २०० फुटानंतर दूषित पाणी असते. त्यात जादा क्षार असतात. ते पाणी पिण्यायोग्य नसते. तरीही बोअरचालक मनमानीपणे ५०० फुटापर्यंत खोदकाम करीत आहे.महसूल व कर बुडतो पाण्यातकोणतीही परवानगी घेतली जात नसल्याने शासनाचा महसूल आणि विविध विभागांचा कर पाण्यात बुडत आहे. बोअरला परवानगी देण्याचे काम यवतमाळच्या भूजल सर्वेक्षण विभागाकडे आहे. त्यांचेच त्यावर नियंत्रण असते. त्यामुळे पालिकेचा याच्याशी संबंध नसल्याचे मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी