शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची नजर पीक पैसेवारी ६६ टक्के

By admin | Updated: October 2, 2016 00:12 IST

अपुऱ्या पावसाने जिल्ह्याला गतवर्षी दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला.

ओल्या दुष्काळाचे सावट : पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली, तुरीची स्वतंत्र पीक पैसेवारी काढण्याचे आदेशरूपेश उत्तरवार यवतमाळ अपुऱ्या पावसाने जिल्ह्याला गतवर्षी दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला. यावर्षी अती पावसाने ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे. क्षमतेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पीक हातातून जाण्याच्या स्थितीत आहे. सोयाबीनची अर्ली व्हेरायटी पाण्यात सापडली तर मजूरांअभावी शेतातील मूग उडीदाला कोंबं फुटले आहेत. धुवारीने कपाशीच्या पात्या गळत आहेत. ज्वारी काळी पडण्याची चिन्हे आहेत. या स्थितीत महसूल मंडळांनी जिल्ह्याची पीक परिस्थिती उत्तम असल्याचा ६६ टक्के नजर अंदाज सादर केला आहे.पावसाची फाईल बंद होण्यासाठी एक महिन्याचा अवधी आहे. या स्थितीत जिल्ह्याने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. यामुळे जिल्ह्यात ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नऊ तालुक्याने यापूर्वीच वार्षिक सरासरी ओलांडली आहे. या ठिकाणी वार्षिक सरासरीच्या १४८ टक्के पाऊस नोंदविला गेला. सर्वाधिक पाऊस महागावात झाला. या तालुक्याची वार्षिक सरासरी ६७२ मिमी. असताना १२७४ मिमी. पाऊस झाला. ही सरासरी १४८ टक्के आहे. आर्णी, यवतमाळ, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड व वणी तालुक्यात क्षमतेपेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे. इतर तालुके वार्षिक सरासरी ओलांडण्याच्या काठावर आहेत. एकंदरीत सर्वच तालुक्याचे चित्र अतिशय बिकट आहे.असा आहे नजर पैसेवारीचा अहवालजिल्ह्याच्या नजर पैसेवारीत सर्व १६ तालुक्यात चांगली पीक परिस्थिती असल्याचे नमुद केले आहे. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६६ टक्के आहे. दिग्रस तालुक्याची पैसेवारी ७१ टक्केच्या घरात आहे. सर्वात चांगले पीक या तालुक्यातील असल्याचे मंडळांनी स्पष्ट केले आहे. यवतमाळ ६३, कळंंब ६४, बाभूळगाव ६३, आर्णी ६७, दारव्हा ६७, नेर ७०, पुसद ७०, उमरखेड ६६, महागाव ६६, केळापूर ६५, घाटंजी ६४, राळेगाव ६२, वणी ६३, मारेगाव ६८ तर, झरीची पैसेवारी ६३ टक्के नोंदविण्यात आाली आहे. तुरीची पैसेवारी प्रथम नोंदविली जाणार अमरावती आणि नागपूर विभागामध्ये प्रामुख्याने तुरीची लागवड होते. मात्र तुरीचे पीक निघण्यापूर्वी अंतिम पैसेवारी जाहीर होते. यामुळे शेतकऱ्यांना तुरीच्या नुकसानीचा लाभ मिळत नाही. यावर मात करण्यासाठी अमरावती आणि नागपूर विभागात तुरीच्या पिकासाठी रब्बी पीक पैसेवारी जाहीर केली जाणार आहे. यावर तुरीची नोंद घेतली जाणार आहे.