शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

देशातील जनता अधिकारांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 6:00 AM

गेल्या १६ दिवसांपासून उमरखेड येथे सीएए कायद्याविरुद्ध शाहीन बागच्या धर्तीवर कुल जमाती इत्तेहाद महाजतर्फे धरणे आंदोलन सुरू आहे. बुधवारी आंदोलनाला डॉ.कासिम रसूल इलियास यांनी संबोधित केले. त्यांनी या कायद्यामुळे केवळ मुस्लीमच नव्हेतर देशातील गरीब, मजूर, अशिक्षित, आदिवासी आदी प्रभावित होणार असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देउमरखेड, दिग्रस येथे सभा : कासिम रसूल इलियास व फारूक अहेमद यांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड/दिग्रस : भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना अधिकार बहाल केले. मात्र स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही जनता अधिकारांपासून वंचित असल्याचा आरोप मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते तथा वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.कासिम रसूल इलियास यांनी उमरखेड येथे नांदेड रोडवरील शाहीन बाग आंदोलनाला मार्गदर्शन करताना बुधवारी केला.गेल्या १६ दिवसांपासून उमरखेड येथे सीएए कायद्याविरुद्ध शाहीन बागच्या धर्तीवर कुल जमाती इत्तेहाद महाजतर्फे धरणे आंदोलन सुरू आहे. बुधवारी आंदोलनाला डॉ.कासिम रसूल इलियास यांनी संबोधित केले. त्यांनी या कायद्यामुळे केवळ मुस्लीमच नव्हेतर देशातील गरीब, मजूर, अशिक्षित, आदिवासी आदी प्रभावित होणार असल्याचे सांगितले. सध्या देशातील केवळ एक टक्के लोकांजवळ ७४ टक्के तर ९९ टक्के लोकांकडे केवळ २४ टक्के साधनसंपत्ती आहे. एकतृतांश लोक उपासमारीने ग्रस्त आहे. देशात दर १२ मिनिटाला एक बलात्कार होत आहे. ४० टक्के लोक अशिक्षित आहे. त्यामुळे भारताच्या नवनिर्मितीसाठी संपूर्ण देशवासीयांनी सज्ज व्हावे, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले.दिग्रस येथे बुधवारी सायंकाळी ५ वाजता टाऊन हॉल प्रांगणातील धरणे आंदोलनाला संबोधित करताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सचिव फारूक अहेमद यांनी देशातील बहुजन, मूळ निवासींची छळवणूक, अन्याय, अत्याचार व असमानता ही नवीन बाब नसल्याचे स्पष्ट केले. हजारो वर्षांपासून अत्याचार सुरू आहे. महात्मा चार्वाक, महात्मा महावीर, महात्मा गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवराय, सावित्रीबाई व ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रपिता महात्मा गांधी, दाभोलकर, कलबुर्गी, लंकेश या सर्वांची हत्त्या किंवा छळवणूक करण्यामागे विषारी विचारधारा असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी गोविंद दळवी, प्रमोद राऊत, संजय खंडारे, नगरसेवक के.टी. जाधव, हरिदास मोगले, दीक्षा मोगले आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी घोषणाबाजी केली.