शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

देशातील जनता अधिकारांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:00 IST

गेल्या १६ दिवसांपासून उमरखेड येथे सीएए कायद्याविरुद्ध शाहीन बागच्या धर्तीवर कुल जमाती इत्तेहाद महाजतर्फे धरणे आंदोलन सुरू आहे. बुधवारी आंदोलनाला डॉ.कासिम रसूल इलियास यांनी संबोधित केले. त्यांनी या कायद्यामुळे केवळ मुस्लीमच नव्हेतर देशातील गरीब, मजूर, अशिक्षित, आदिवासी आदी प्रभावित होणार असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देउमरखेड, दिग्रस येथे सभा : कासिम रसूल इलियास व फारूक अहेमद यांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड/दिग्रस : भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना अधिकार बहाल केले. मात्र स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही जनता अधिकारांपासून वंचित असल्याचा आरोप मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते तथा वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.कासिम रसूल इलियास यांनी उमरखेड येथे नांदेड रोडवरील शाहीन बाग आंदोलनाला मार्गदर्शन करताना बुधवारी केला.गेल्या १६ दिवसांपासून उमरखेड येथे सीएए कायद्याविरुद्ध शाहीन बागच्या धर्तीवर कुल जमाती इत्तेहाद महाजतर्फे धरणे आंदोलन सुरू आहे. बुधवारी आंदोलनाला डॉ.कासिम रसूल इलियास यांनी संबोधित केले. त्यांनी या कायद्यामुळे केवळ मुस्लीमच नव्हेतर देशातील गरीब, मजूर, अशिक्षित, आदिवासी आदी प्रभावित होणार असल्याचे सांगितले. सध्या देशातील केवळ एक टक्के लोकांजवळ ७४ टक्के तर ९९ टक्के लोकांकडे केवळ २४ टक्के साधनसंपत्ती आहे. एकतृतांश लोक उपासमारीने ग्रस्त आहे. देशात दर १२ मिनिटाला एक बलात्कार होत आहे. ४० टक्के लोक अशिक्षित आहे. त्यामुळे भारताच्या नवनिर्मितीसाठी संपूर्ण देशवासीयांनी सज्ज व्हावे, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले.दिग्रस येथे बुधवारी सायंकाळी ५ वाजता टाऊन हॉल प्रांगणातील धरणे आंदोलनाला संबोधित करताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सचिव फारूक अहेमद यांनी देशातील बहुजन, मूळ निवासींची छळवणूक, अन्याय, अत्याचार व असमानता ही नवीन बाब नसल्याचे स्पष्ट केले. हजारो वर्षांपासून अत्याचार सुरू आहे. महात्मा चार्वाक, महात्मा महावीर, महात्मा गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवराय, सावित्रीबाई व ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रपिता महात्मा गांधी, दाभोलकर, कलबुर्गी, लंकेश या सर्वांची हत्त्या किंवा छळवणूक करण्यामागे विषारी विचारधारा असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी गोविंद दळवी, प्रमोद राऊत, संजय खंडारे, नगरसेवक के.टी. जाधव, हरिदास मोगले, दीक्षा मोगले आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी घोषणाबाजी केली.