शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

फैसला २४ तासांत

By admin | Updated: May 15, 2014 01:29 IST

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची खासदारकीची माळ भावना गवळी यांच्या गळ्यात कायम राहणार की,

काऊंट-डाऊन सुरू, उत्कंठा शिगेला पोहोचली भावनाताई की मोघे साहेब ?

यवतमाळ :

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची खासदारकीची माळ भावना गवळी यांच्या गळ्यात कायम राहणार की, त्यांच्या गळ्यातून निघून ती शिवाजीराव मोघेंच्या गळ्यात पडणार याचा फैसला पुढील २४ तासात होणार आहे. त्याचे काऊंट-डाऊन सुरू झाले आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी १० एप्रिल रोजी मतदान घेतले गेले. त्यानंतर सुमारे महिनाभर निकालाची प्रतीक्षा होती. मतदानाच्या आठवडाभरानंतर कोण निवडून येणार ही चर्चा थांबली. परंतु गेल्या चार दिवसांपासून पुन्हा यवतमाळ-वाशिमचा खासदार कोण याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. १६ मे ही तारीख जसजसी जवळ येत आहे तसतशी ही चर्चा आणखी जोर पकडू लागली आहे.

युती व आघाडीकडून आपल्या उमेदवाराच्या समर्थनार्थ विजयाचा जोरदार युक्तीवाद केला जात असून तो पटवून देण्यासाठी आकडेमोडही केली जात आहे. दोनही कडे विजयाचा प्रचंड आत्मविश्वास आहे. काँग्रेसला पुसद व राळेगाव या मतदारसंघात मतांची नेमकी किती आघाडी मिळते याचा अंदाज लागेनासा झाला आहे. तरीही १५ ते २५ हजाराच्या आघाडीने मोघे साहेब निघतील, असा दावा त्यांचे निकटवर्तीय करीत आहेत. मुस्लीम, आदिवासी आणि त्यातही आंध समाजाची मिळालेली ९० ते १०० टक्के मते ही मोघेंसाठी जमेची बाजू ठरल्याचे काँग्रेस कार्यकर्ते सांगत आहे. ज्या प्रमाणे भावना गवळींसाठी कुणबी समाज एकत्र आला त्याच प्रमाणे मोघेंसाठी बंजारा समाजासह अन्य अल्पसंख्यक समाज एकत्र आल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगितले जाते. शिवाय भावना गवळींबाबतची समाजासह पक्ष कार्यकर्ते व सहकारी पक्षांमध्ये असलेली नाराजी, मोघेंचा फ्रेश चेहरा या बाजूही काँग्रेससाठी जमेच्या ठरल्या. तिकडे भावना गवळी यांना आपल्या मतांची आघाडी गतवेळीएवढीच अर्थात ५० हजारांवर राहील, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करताहेत. कुणबी समाजाची एकजूट, मोदींची लाट, बंजारा मतांचे विभाजन, काँग्रेसऐवजी बसपाकडे वळलेला दलित समाज, मर्यादित राहिलेला मनसेचा उमेदवार या भावना गवळींच्या विजयाच्या दाव्यासाठी जमेच्या बाजू ठरल्या आहेत. मोघेंच्या निवडक समर्थकांमध्ये विजयाचा विश्वास दिसत असला तरी सरसकट काँग्रेसमध्ये मात्र तो पहायला मिळत नाही.

एक्झीट पोलचा मोदी लाटेचा कल पाहता काँग्रेसच्या गोटात स्मशान शांतता पहायला मिळत आहे. अनेक नेते मंडळी गावाबाहेर असून ते १६ मे रोजीच प्रकटणार आहेत. लोकसभेचे खरे राजकारण निकालानंतरच सुरू होणार आहे. पराभवाला कोण कारणीभूत ठरले याचा हिशेब विधानसभेत चुकता होईल. (जिल्हा प्रतिनिधी) सन २००९ लोकसभा निवडणुकीची स्थिती एकूण उमेदवार - २८ भावना गवळी (शिवसेना) - ३ लाख ८४ हजार ४४३ हरिभाऊ राठोड (काँग्रेस) - ३ लाख २७ हजार ४९२ अ‍ॅड. दिलीप एडतकर (बसपा) - ६३ हजार ७८१ शिवसेना - ५६ हजार ९५१ मतांनी विजयी शिवसेनेचा विजय झाल्यास लालदिव्याची संधी तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची गच्छंती 1शिवसेनेच्या भावना गवळी विजयी झाल्यास त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण शिवसेनेच्या त्या राज्यातील एकमेव महिला उमेदवार आहेत. खासदार म्हणून भावना गवळी यांनी २००९ मध्येच आपली खासदारकीची विजयाची हॅट्ट्रीक पूर्ण केली आहे. २०१४ ची ही निवडणूक त्यांची चौथी टर्म आहे. शिवसेनेचा विजय झाल्यास यवतमाळ जिल्ह्याला पहिल्यांदाच केंद्रातील लाल दिवा मिळण्याची संधी चालून येणार आहे.

2काँग्रेसचे शिवाजीराव मोघे विजयी झाल्यास त्यांना विरोधी बाकावर बसावे लागण्याची शक्यता आहे. मात्र ते विजयी झाल्यास महाराष्टÑाच्या मंत्रीमंडळात जिल्ह्यातून स्थानिक आमदारांना मात्र निश्चितच फायदा होईल. त्या दृष्टीने येथील माणिकराव ठाकरे, वामनराव कासावार यांना आतापासूनच मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यातील वर्णीचे वेध लागले आहेत. अशीच स्थिती चंद्रपुरात राहील. तेथे सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे रिंगणात आहेत. 3शिवाजीराव मोघे आपल्या परंपरागत केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी मुलगा जितेंद्र मोघे याला प्रोजेक्ट करीत आहे. त्यासाठी त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधण्यात आले आहे. ते पाहता मोघेंना लोकसभेतील विजयाची खात्री असल्याचे स्पष्ट होते. मोघे निवडून यावे म्हणून वसंत पुरके यांनी आपल्या राळेगाव मतदारसंघात चांगलीच मेहनत घेतली. त्यामागेसुद्धा त्यांचा मंत्रिमंडळात वर्णी लागण्याचा स्वार्थ असल्याचे सांगितले जाते. 4महाराष्टÑातील निवडणुका या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंच्या नेतृत्वात लढल्या गेल्या. मात्र एक्झीट पोलचे अंदाज पाहता काँग्रेसचा सफाया होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. तसे झाल्यास माणिकरावांची प्रदेशाध्यक्ष पदावरील गच्छंती निश्चित मानली जात आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून माणिकराव स्वत: राजीनामा देतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पराभव आणि प्रदेशाध्यक्ष पद जाण्याच्या भीतीनेच माणिकरावांनी लोकसभेच्या रिंगणात उतरणे टाळले. 5सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम मतदारसंघात ५८.८० टक्के मतदान झाले. २००९ च्या तुलनेत पाच टक्के त्यात वाढ झाली. ही वाढ नेमकी कुणाच्या पथ्यावर पडणार याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. त्यात युवकांची मते निर्णायक आहेत.