शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पतसंस्था एजंटाचे भरदिवसा अपहरण

By admin | Updated: March 19, 2016 02:11 IST

निळोणा धरण परिसरात प्रेमीयुगुलाला त्रास दिल्याचा वचपा म्हणून पतसंस्थेच्या पिग्मी एजंटाचे शुक्रवारी सकाळी ११

यवतमाळ : निळोणा धरण परिसरात प्रेमीयुगुलाला त्रास दिल्याचा वचपा म्हणून पतसंस्थेच्या पिग्मी एजंटाचे शुक्रवारी सकाळी ११ वाजता स्थानिक येरावार चौकातील इंद्रप्रस्थ प्लाझा येथून अपहरण करण्यात आले. या एजंटाला उमरसरा येथील बाबाजी दाते टेकडी परिसरात नेऊन खोलीत डांबण्यात आले. तेथे त्याला मारहाण करून त्याची चित्रफितही बनविण्यात आली. मात्र वेळीच पोलीस पोहोचल्याने क्रूरतेकडे जाणारा हा प्रकार थांबला.रवींद्र वामन राठोड (२३) रा. चौधरा असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर प्रणव माने, नितीन डेम्मेवार, प्रवीण मडावी, रवी फुलकर, प्रसाद वाजपेयी सर्व रा. उमरसरा असे संशयित आरोपींची नावे आहे. यातील प्रणव माने याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याजवळून मारहाणीची चित्रफीत काढलेला मोबाईल जप्त केला आहे. रवींद्र हा येरावार चौकातील एका पतसंस्थेसाठी पिग्मी एजंट म्हणून काम करतो. शुक्रवारी सकाळी ११ वाजता नेहमीप्रमाणे पतसंस्थेत आला. त्यावेळी त्याला एका तरुणाने बाहेर बोलाविले. काही कळण्याच्या आतच त्याला चाकू लावून जबरदस्तीने दुचाकीवर बसविण्यात आले. तेथून दारव्हा नाका परिसरात जाऊन आणखी दोघांना सोबत घेऊन उमरसरा परिसरातील बाबाजी दाते टेकडी जवळच्या गोरक्षण परिसरात निर्जनस्थळी रवींद्रला आणले. तिथे एका पडक्या खोलीत आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचे मोबाईल शूटिंग करण्यात आले. दरम्यान अपहरण झाल्याची माहिती तातडीने शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. पतसंस्थेतूनच रवींद्रचे अपहरण झाल्याचे त्याच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. यवतमाळात असलेल्या नातेवाईकांनी शहर ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. यानंतर तातडीने प्रभारी ठाणेदार संग्राम ताटे यांनी पथकासह घटनास्थळ गाठून पतसंस्था व त्या व्यापारी संकुल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून आरोपींची ओळख पटली व शोध सुरू झाला. पोलिसांनी तपास काढत गोरक्षण परिसर गाठला. तेथे त्यांना रवींद्र हा आढळून आला. दरम्यान आरोपी पसार झाले होते. हा प्रकार रवींद्रने निळोणा धरण परिसरात प्रेमीयुगुलाला त्रास दिल्याचा वचपा म्हणून काढल्याची माहिती समोर आली. यातूनच त्याचे अपहरण करण्यात आले. मात्र सुर्दैवाने पोलीस पोहोचल्याने रवींद्र सुखरुप राहिला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. (कार्यालय प्रतिनिधी) ४उमरसरा येथील बाबाजी दाते टेकडी परिसरातील ही सलग दुसरी घटना आहे. गुरुवारी याच परिसरात अमन मिश्रा या शालेय विद्यार्थ्याचा निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच शुक्रवारी पतसंस्थेच्या पिग्नी एजंटाच्या अपहराचे प्रकरण उघडकीस आले. आरोपींनी या एजंटाला याच टेकडी परिसरातील एका घरात नेऊन मारहाण केल्याचे पुढे आल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.