शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

Coronavirus in Yawatmal अतिआत्मविश्वास नडला; पहिली लाट रोखलेली सर्वच गावे कोरोनाच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 08:59 IST

Coronavirus in Yawatmal यवतमाळ जिल्ह्यात २०४० गावे आहेत. यातील १७०० गावांनी पहिल्या टप्प्यात कोरोनाला वेशीवरच रोखले होते. दुसऱ्या लाटेत प्रत्येक गाव कोरोनाच्या शिरकावाने धास्तावले आहे.

ठळक मुद्दे गावामध्ये चाचण्यांचे प्रमाण कमी

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : जिल्ह्यात २०४० गावे आहेत. यातील १७०० गावांनी पहिल्या टप्प्यात कोरोनाला वेशीवरच रोखले होते. दुसऱ्या लाटेत प्रत्येक गाव कोरोनाच्या शिरकावाने धास्तावले आहे. ज्या ज्या ठिकाणी आरोग्य विभागाचे कॅम्प लागत आहे, त्या प्रत्येक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.

जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या ५० हजारांच्यावर पोहोचली आहे. ११०० च्यावर मृत्यूची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत गाव सुरक्षित असल्याचा अतिआत्मविश्वास गावकऱ्यांनाच भारी पडला आहे. कोरोना हा आजारच नाही, असे अनेकजण आजपर्यंत मानत आले. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांना झालेली वेदना पाहता आता या आजारापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत. मात्र, अजूनही पाहिजे त्या प्रमाणात कोरोना नियमावलीचे पालन गावपातळीवर होत नाही. काही गावांमध्ये परिस्थिती चांगली आहे, तर काही गावांमध्ये अजूनही तपासणी मोहीम राबविली गेलेली नाही.

 

आमच्या गावामध्ये ९३ च्या जवळ रुग्ण होते. सर्दी, खोकला, ताप असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आणि कोरोनाबाधितांचा आकडा वाढत गेला. आता सर्व काही बंद झाले आहे.

- दिलीप अवचट, सरपंच, जांभोरा

 

सर्दी, खोकला, अंगदुखी याचे सर्रास रुग्ण होते. अजूनही आजाराचे प्रमाण दिसत आहे. आरोग्य विभागाने तपासणी करून रुग्णसंख्या कमी केली आहे.

- गोदाबाई केराम,

सरपंच रुई

संपूर्ण गाव कोरोना नियमावलीचे पालन करीत आहे. यामुळे आजपर्यंत तरी गावात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. उद्याला गावात कॅम्प लागणार आहे.

- शीतल शेलकर,

सरपंच, गाजीपूर

 

कोरोना पोहोचण्याची अशी आहेत कारणे

- गावखेड्यातून शहरात जाणारी मंडळी रोजगाराच्या शोधात दररोज अथवा आठवड्यातून एक वेळेस गावात येतात.

- वाढलेला आजार अंगावर काढणे हे प्रमुख कारण कोरोना वाढण्यासाठी घातक ठरले आहे.

- कोरोना आजारच नाही, हे काही तरी भलतेच आहे, या गैरसमजातून रुग्ण वाढले.

- कोरोना नियमाचे पालन न करणे, लग्न समारंभाचे प्रमाण वाढणे या बाबी कारणीभूत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस