शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कोरोनाचे रुग्ण घटले; शेकडो बेड रिकामे पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 05:00 IST

जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी २२७८ बेड विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. त्यातील तब्बल १८७८ बेड सध्या रिकामे असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. उपलब्ध बेडपेक्षाही जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटणे हे चांगले संकेत मानले जात आहे. दरम्यान, रुग्णसंख्या घटत असली तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे कामानिमित्त बाहेर वावरताना नागरिकांनी अजूनही कोरोनाची त्रिसूत्री काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देरुग्ण १६४९ तर बेड २२७८ : रविवारी सव्वाशे पाॅझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या रुग्णाला बेड मिळणे कठीण झाले होते. मात्र सध्या जिल्ह्यातील उपलब्ध बेडपेक्षाही ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे दवाखान्यांतील रिकाम्या बेडचे प्रमाण वाढले आहे. रविवारी जिल्ह्यात केवळ १२३ नव्या पाॅझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर तब्बल ३०० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १६४९ एवढी घसरली आहे. मात्र दिवसभरात तिघांचा मृत्यू झाल्याने काळजी पूर्णत: मिटल्याची चिन्हे नाहीत.रविवारी झालेले तिन्ही मृत्यू खासगी दवाखान्यात नोंदविण्यात आले. त्यात पांढरकवडा तालुक्यातील ५३ वर्षीय पुरूष, वणी तालुक्यातील ६५ व ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.पॉझिटिव्ह आलेल्या १२३ जणांमध्ये ९० पुरुष आणि ३३ महिला आहेत. यात आर्णी येथील ३, बाभूळगाव येथील २८, दारव्हा येथील १८, दिग्रस येथील २०, घाटंजी २, कळंब २, महागाव येथील १, मारेगाव येथील १, नेर येथील २, पांढरकवडा २, पुसद येथील १६, राळेगाव ४, उमरखेड १, वणी येथील ४, यवतमाळ १७ तर झरीजामणी येथील २ रुग्ण आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी २२७८ बेड विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. त्यातील तब्बल १८७८ बेड सध्या रिकामे असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. उपलब्ध बेडपेक्षाही जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटणे हे चांगले संकेत मानले जात आहे. दरम्यान, रुग्णसंख्या घटत असली तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे कामानिमित्त बाहेर वावरताना नागरिकांनी अजूनही कोरोनाची त्रिसूत्री काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. लसीकरणाला प्रतिसाद देऊनच कोरोना प्रतिबंध शक्य असल्याचे सांगण्यात आले. 

मृत्यूदर अडीच टक्केचजिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त आकडेवारीनुसार, जिल्हयात आतापर्यंत सहा लाख १९ हजार २५३ नागरिकांच्या कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैकी पाच लाख ४४ हजार २९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ११.६० असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर २.८२ टक्के आहे तर मृत्युदर २.४५ टक्के आहे.

दिवसभरात चार हजार अहवाल निगेटिव्हरविवारी एकूण ४३५४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२३ जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर ४२३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात १६४९ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी ६९४ रुग्णालयात भरती आहेत.तर ९५५ जण गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१ हजार ८१३ झाली आहे. रविवारी ३०० जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ६८ हजार ४०४ आहे. तर एकूण १७६० मृत्यूची नोंद आहे. दरदिवशी रुग्णांचा आकडा घटत असला तरी मृत्युसंख्या अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. रविवारीही तीन बळी गेले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या