शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
3
"संतोष देशमुखांच्या हत्येला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार"; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
4
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
5
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
6
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
7
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
8
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
9
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
10
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
11
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
12
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
13
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
14
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
15
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
16
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
17
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
18
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
19
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू

सत्तेसाठी काँग्रेस-राकाँ अवसरवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:44 IST

राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांकडील गांधीवाद संपला आहे. ते अवसरवादी झाले आहे. जेथे संधी मिळेल तेथे ते सेना, भाजपसोबत सत्ता स्थापन करत आहे. उदगिरमध्ये काँग्रेसने एमआयएमचा प्रस्ताव फेटाळून सत्तेसाठी भाजपाला सोबत घेतले आहे.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : तिवारी, शेट्टींवर टीका, वंचित आघाडीच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांकडील गांधीवाद संपला आहे. ते अवसरवादी झाले आहे. जेथे संधी मिळेल तेथे ते सेना, भाजपसोबत सत्ता स्थापन करत आहे. उदगिरमध्ये काँग्रेसने एमआयएमचा प्रस्ताव फेटाळून सत्तेसाठी भाजपाला सोबत घेतले आहे. यावरून काँग्रेस, राष्ट्रवादीचे खायचे दान अन् दाखवायचे दात वेगळे आहे, असा आरोप बहुजन वंचित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.बहुजन वंचित आघाडीची जाहीर सभा येथील समता मैदानावर बुधवारी सायंकाळी पार पडली. यावेळी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील मुंबईच्या विकास आराखड्यावर बोलतात. दुसरीकडे मात्र त्यांच्याच नगर जिल्ह्यातील २२ साखर कारखाने सरकारच्या धोरणामुळे बंद पडले आहेत, त्याबाबत बोलत नाही. मुंबईतील एका एकराचं आरक्षण हटविण्यासाठी किमान ५०० कोटीचा व्यवहार होतो. हा व्यवहारातील पैशाच्या हिशोब पाहून विरोधी पक्ष भूमिका घेत आहे. शेतकऱ्यांचा कैवार दाखविणारे शेतकरी नेते केवळ डिंगा हाकतात. किशोर तिवारी, राजू शेट्टी यांच्या भूमिका योग्य नाही. सरकारने पाकिस्तानातून २० लाख मेट्रीक टन साखर स्वस्त दरात खरेदी केली. त्यामुळे येथील ऊस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला. हा प्रश्न कुणी उचलला नाही. टमाटे, कांदे या मालाला भाव नाही. हा माल टिकवता येईल, अशी कारखानदारी सरकार उभं करत नाही. त्यामुळे प्रत्येकाने बहुजन वंचित आघाडीलाच संधी द्यावी, देशातील उतरंडीची व्यवस्था संपविण्यासाठी सर्वांची भूमिका एक हवी. माझ्या वरती किंवा खाली कोणी नाही हा विचार घेवून प्रत्येकाने सत्तेपासून वंचित राहिलेल्यांसाठी झटले पाहिजे, असे आवाहन करत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून बहुजन वंचित आघाडीची उमेदवारी प्रवीण पवार यांना दिल्याचे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रणधीर खोब्रागडे यांनी केले. त्यानंतर पश्चिम जिल्हाध्यक्ष उत्तम पांडे, प्रवक्ता राजा गणवीर, भास्कर पंडागळे, एमआयएमचे सैयद इरफान, धनराज उईके, चंदन तेलंग, पुष्पा इंगळे, बालमुकुंद भिरड, हिरासिंग राठोड, डॉ.दशरथ भांडे, रविकांत राठोड, माजी आमदार हरिदास भदे आदींनी मार्गदर्शन केले. आभार राजेंद्र तलवारे यांनी मानले.७० वर्षानंतर मनुवाद्यांचे डोके वरमनुवाद्यांविरोधातील पहिली लढाई नाही. शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार-अलुतेदार शेतकºयांना सोबत घेवून मनुवादी व्यवस्था मोडीत काढली. रयतेचं राज्य उभं केलं. मात्र आता पुन्हा पेशवाईचं राज्य आलं आहे. लोकशाही ही प्रत्येकाच्या हातात आहे. ती टिकवण्यासाठी स्वत:च्या मताची किमत केली पाहिजे. आरएसएसचे मोहन भागवत संविधान नको मनुवादी व्यवस्था आणायची घोषणा करत आहे. याचे भान ठेवून धर्मवाद्यांना बळी न पडता आपल्या मताची किमत करावी, असेही आंबेडकर म्हणाले.नरेंद्र मोदींचे सरकार महाचोरदेशाच्या पंतप्रधानांनी गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रतिसादाला साद देत २२ हजार कोटींची सबसिडी नागरिकांनी सोडली. मात्र ही सबसिडी गोरगरिबांना दिली नाही. हे सरकार खोटारड आहे, त्यांनी १५ लाख देण्याची, काळा पैसा परत आणण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात तसं झालं नाही. मात्र महानगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये एक मत पाच हजाराला विकत घेतले. ते पैसे सत्ताधाºयांकडे आले कोठून, मागचं सरकार चोर होतं. मात्र हेही सरकार महाचोर आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर