शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

शेतमालाला ‘हमी’ नव्हेतर चक्क ‘कमी’ दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 5:00 AM

मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे कापूस, तूर, सोयाबीन हे मुख्य पीक आहे. यावर्षी तालुक्यात कापूस ३१ हजार ८१२ हेक्टर, तूर पाच हजार ७३१ हेक्टरवर, तर सोयाबीन सहा हजार २३५ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. आता शेतीचा हंगाम संपत असल्याने हे सर्व नगदी पीके शेतकऱ्यांच्या घरात आली आहे.

ठळक मुद्देविक्रीअभावी शेतकरी अडचणीत, शासकीय कापूस-तूर खरेदी बंद, खुलेआम लूट

देवेंद्र पोल्हे ।लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : तालुक्यात शासकीय कापूस व तूर खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. खासगी व्यापारी ‘हमी’ नाही, तर ‘कमी’ भावाने शेतमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करित आहे. शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट बघता तालुक्यात शासकीय कापूस व तूर खरेदी केंद्र सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी राजकीय प्रयत्न होणे गरजेचे आहे.मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे कापूस, तूर, सोयाबीन हे मुख्य पीक आहे. यावर्षी तालुक्यात कापूस ३१ हजार ८१२ हेक्टर, तूर पाच हजार ७३१ हेक्टरवर, तर सोयाबीन सहा हजार २३५ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. आता शेतीचा हंगाम संपत असल्याने हे सर्व नगदी पीके शेतकऱ्यांच्या घरात आली आहे. परंतु तालुक्यातील शासनाच्या या तिनही पिकाच्या शासकीय खरेदी बंद आहे. खुल्या बाजारात शासकीय खरेदी बंद असल्याने सोयाबीन वगळता तूर व कापसाचे दर हमी भावापेक्षा खूपच खाली गेले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. शेतकऱ्यांना पैशाची निकड आहे आणि शासकीय खरेदी बंद आहे. याचा फायदा खासगी व्यापारी उचलत आहे. आज कापूस खासगी व्यापारी पाच हजाराच्या कमी भावाने खरेदी करीत आहे, तर तुरीचे दरही खूपच खाली आहे. तालुक्यातील शेतमाल विक्रीअभावी कोंडीत सापडला असताना त्याला राजकीय पाठबळाची गरज आहे. तालुक्यात एकमेव असलेले सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र गेल्या दोन आठवड्यापासून बंद आहे. सीसीआयला कापसाची विक्री करताना शेतकरी वैतागले होते. शासनाची नाफेडतर्फे तालुक्याच्या ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे होते. परंतु शहरातील एकाही संस्थेने प्रस्ताव न पाठविल्याने मारेगावात नाफेडचे तूर खरेदी केंद्र मिळाले नाही आणि आता हे केंद्र गोंडबुरांडा सोसायटीला मिळाल्याचे कळते. परंतु या सोसायटीकडे ना स्वत:चे गोडाऊन आहे, ना तूर खरेदीचा आहे. त्यामुळे ही सोसायटी खरच तूर खरेदी करेल काय, याबद्दल शंका आहे.राजकीय उदासीनतातालुक्यातील शेतकरी शेतमालाची योग्य दरात विक्री होत नसल्याने आणि शासकीय खरेदी केंद्र कायमचे बंद राहण्याच्या भितीने कोंडीत सापडला असताना शेतकºयांच्या पाठीशी पुरेशे राजकीय पाठबळ उभे असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत नाही. सीसीआयला कापूस विकताना कर्मचाऱ्यांची मुजोरी व संथ कापूस खरेदी, यामुळे शेतकºयांची दमछाक होत आहे. त्यातच हे केंद्र वारंवार बंद राहते. अशातच मारेगाव येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र नाही. याविरोधात राजकीय आवाज दबलेला दिसतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढाºयांनी आता समोर येण्याची गरज आहे.शासकीय खरेदी सुरू करण्यासाठी प्रयत्नांची गरजसध्या शहरासह तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल साठवून ठेवलेला आहे. त्यातच शासकीय खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी घुसमट होत आहे. लोकप्रतिनिधी आणि तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहून कापूस व तुरीची शासकीय खरेदी सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून आता केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी