ग्रामपंचायतीतही स्पष्ट बहुमताचा कौल

By Admin | Updated: July 29, 2015 02:27 IST2015-07-29T02:27:59+5:302015-07-29T02:27:59+5:30

ग्रामपंचायत निवडणूकीतील मुद्दे पुर्णत: भिन्न असतात. सर्वात कठीण निवडणूक म्हणून ग्रामपंचायतीचा उल्लेख केला जातो.

The clear majority in the gram panchayat also | ग्रामपंचायतीतही स्पष्ट बहुमताचा कौल

ग्रामपंचायतीतही स्पष्ट बहुमताचा कौल

स्थिर सत्ता : विधानसभा, लोकसभेची पुनरावृत्ती
यवतमाळ : ग्रामपंचायत निवडणूकीतील मुद्दे पुर्णत: भिन्न असतात. सर्वात कठीण निवडणूक म्हणून ग्रामपंचायतीचा उल्लेख केला जातो. यात स्पष्टबहुमत अपवादात्मक स्थितीतच मिळते. मात्र नुकत्याच झालेल्या ४६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बहुतांश गावात मतदारांनी स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे.
स्पष्टबहुमत अथवा एकाच पक्षाला भरघोस मते हा कौल लोकसभा निवडणुकीत आढळून आला. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेतही झाली. मतदारांनी तोच कित्ता ग्रामपंचायतीतही गिरवला आहे. गावातील विशिष्ट एका पॅनललाच बहुमत मिळेल अशा पध्दतीने मतदान झाल्याचे दिसून येते. अन्यथा आतापर्यंत ग्रामपंचायतीतही कुबड्याचे समर्थन घेऊनच सत्ता स्थापन केली जात होती. काठावरच्या बहुमतामुळे अविश्वास आणण्याचेही प्रकार होत होते. अपवादात्मक स्थितीतच एखादा गावात बहुमतातील सरपंच राहत होता.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी दिलेला कौल एकाच बाजूला गेल्याने पाच वर्षसाठी स्थिर अशी सत्ता स्थापन करणे सोयीस्कर झाले आहे. अनेक गावात उठसूठ अविश्वास ठराव आणण्याचा प्रकार घडत होता. त्यालाही आता लगाम बसणार आहे. आता लवकर या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडीची प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The clear majority in the gram panchayat also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.