शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

''मुख्यमंत्री भाऊ, डबघाईस आलेल्या कुटुंबाला सावरण्याचं बळ द्या''

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 20:41 IST

परतीच्या अवकाळी पावसाने शेतातील नेस्तनाबूत झालेले पीक पाहून चिंताग्रस्त तरुण मुलाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला.

यवतमाळ: परतीच्या अवकाळी पावसाने शेतातील नेस्तनाबूत झालेले पीक पाहून चिंताग्रस्त तरुण मुलाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. एका मुलीच्या लग्नाकरिता उसनवार घेतलेले कर्ज कसे फेडायचे ?, दुस-या विवाहयोग्य मुलीचे लग्न कसे करायचे ?, शेतीकरिता घेतलेले कर्ज कसे फेडायचे ?, संसाराचा पुढील गाडा कसा पेलायचा? अशा नानाविध प्रश्नाने मनात काहुर माजलेले आहे. अशा कठीण प्रसंगी मुख्यमंत्री भाऊ, माझ्या डबघाईस आलेल्या कुटुंबाला सावरण्याचं बळ द्या, अशी आर्त साद मागील वर्षी मुंबई येथे जाऊन देवेंद्र फडणवीसांना राखी बांधणा-या एका मुस्लिम बहिणीने घातली आहे. अकोला बाजार येथील शेतकरी विधवा महिला फरजानाबी हुसेनखाॅ पठाण ( 62) यांना आठ मुली असून, एक तरुण मुलगा होता. त्यापैकी सात मुलीचे लग्न झाले असून, एक मुलगी सध्या विवाहयोग्य आहे. मागील उन्हाळ्यात एका मुलीचे लग्न झाले. त्या लग्नाकरिता घेतलेले खासगी कर्ज, शेताकरिता घेतलेले पीककर्ज आता कशाने फेडायचे अशी चिंता त्यांचा मुलगा अरबाजखाॅ हुसेनखाॅ पठाण याला भेडसावत होती. तो 31 ऑक्टोबर रोजी गुरुवारी सकाळी शेतात गेला, एवढ्या कष्टाने उभे केलेले पीक परतीच्या अवकाळी पावसाने हातातून गेलेले पाहून त्याला ह्रदयाघात झाला आणि त्यात त्याचे निधन झाले. यंदा त्याचेही लग्न करायचे ठरले होते. एकुलता एक होतकरू मुलगा मरण पावल्यामुळे फरजानाबीचे कुटुंब पोरके झाले आहे. अवकाळी पावसाने शेतातील पीकही गेले, तरुण होतकरू मुलगाही जग सोडून गेला, त्यामुळे पुढील आयुष्य जगायचे कसे, मुलीचे लग्न कसे करायचे, कर्ज कसे फेडायचे असे नानाविध प्रश्न भेडसावत असताना फरजानाबींना अशा संकटकाळी भाऊ म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आठवण आली. माझ्या डबघाईस आलेल्या कुटुंबाला सावरण्याचं बळ द्या व माझ्या कुटुंबाचे रक्षण करा म्हणत फरजानाबींनी देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे आर्त साद घातली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतक-यासंबंधी कर्जमाफीसारखे अनेक निर्णय घेतले. त्या निर्णयाची कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता जिल्ह्यातील दहा शेतकरी महिलांनी मुंबई येथे वर्षा बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली होती. त्यामध्ये अकोला बाजार येथील रहिवासी फरजानाबी यांचा ही समावेश होता.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस