शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
5
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
6
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
7
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
8
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
9
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
10
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
11
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
12
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
13
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
14
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
15
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
16
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
17
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
18
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
19
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
20
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
Daily Top 2Weekly Top 5

दांडीबहाद्दर शिक्षकांवर सीईओंचा रोज ‘वॉच’

By admin | Updated: January 4, 2017 00:10 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील दांडीबहाद्दर शिक्षकांची हजेरी आता प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी

आॅनलाईन दणका : हालचाल रजिस्टर ई-मेलवर
यवतमाळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील दांडीबहाद्दर शिक्षकांची हजेरी आता प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी तपासणार आहेत, तीही रोजची रोज. यात गडबड आढळल्यास कारवाईचा पहिला दणका संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना बसणार आहे. याबाबतचा आदेश सीईओ आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने मंगळवारी बीईओंना पाठविण्यात आला.
सीईओंच्या आदेशानुसार, आता प्रत्येक शिक्षकाची हजेरी नोंदविल्यावर मुख्याध्यापकाला हजेरी रजिस्टरचा व हालचाल रजिस्टरचा फोटो काढून केंद्रप्रमुखाला व्हॉट्सअप करावा लागणार आहे. १०.३५ वाजता हा फोटो मिळालाच पाहिजे. केंद्रप्रमुखांना आपल्या केंद्रातील असे सर्व फोटो प्राप्त होताच सर्व शाळांच्या हजेरीचा संकलित अहवाल तयार करायचा आहे. फोटो व हा अहवाल ११.१५ वाजताच्या आत गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअपवर किंवा ई-मेलवर पाठवावा लागणार आहे. पंचायत समिती अंतर्गत सर्व केंद्रप्रमुखांचे अहवाल आणि फोटो मिळाल्यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना शाळानिहाय अहवाल तयार करावा लागेल. बीईओंचा हा अहवाल कोणत्याही परिस्थितीत १२ वाजताच्या आत जिल्हास्तरावर उपशिक्षणाधिकाऱ्यांना ई-मेल करावा लागणार आहे. सर्व सोळाही तालुक्यांतून येणारे शिक्षक हजेरीचे हे अहवाल १२.३० वाजता सीईओ दीपक सिंगला यांच्यासमोर सादर करावे लागणार आहेत. रोज हालचाल रजिस्टरही तपासले जाणार असल्याने दौरा, बैठक अशा नावाखाली दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर आळा बसणार आहे.
शाळा ते जिल्हा परिषद अशीही आॅनलाईन ‘रिपोर्टिंग’ निर्विघ्न होण्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. मात्र मुख्याध्यापकाला या निमित्ताने एक जागा का करावे लागणार आहे. अनेक गावांमध्ये मोबाईलची रेंज नसल्याने १०.३५ वाजताच्या आत हजेरी रजिस्टरचा फोटो मेल करणे कठीण जाणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

वेतन कपातीसह प्रशासकीय कार्यवाही
शिक्षकांच्या उपस्थितीचा मेल सादर न झाल्यास गटशिक्षणाधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. विलंबाने येणारे, तसेच अनधिकृतपणे गैरहजर राहणारे मुख्याध्यापक, शिक्षक यांचे वेतन कापण्यात येईल. प्रशासकीय कार्यवाहीदेखील करण्यात येईल, असे सीईओंच्या आदेशात म्हटले आहे. शिक्षक वेळेवर हजर असतात की नाही, हे तपासण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथके तयार करून शाळांना आकस्मिक भेटी दिल्या जाणार आहेत.

अनेक जण शाळेत विलंबाने येतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. काही गावांमध्ये मोबाईल रेंज नाही, याची कल्पना आहे. परंतु, कधीतरी पाऊल उचलावेच लागणार होते. गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना याबाबत नियोजन करण्यासाठी दोन-तीन दिवसांचा वेळ देण्यात येईल. त्यानंतर अंमलबजावणी करावीच लागेल.
- डॉ. सुचिता पाटेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, यवतमाळ