शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षक वाघाची दहशत कायम

By admin | Updated: November 14, 2016 01:17 IST

गेल्या तीन महिन्यापासून पांढरकवडा, राळेगाव व कळंब तालुक्यातील सिमावर्ती भागात एका पट्टेदार वाघाने धुमाकुळ घातला आहे.

शेतकरी भयभीत : वाघाचा बंदोबस्त करण्यात वन विभागाला अपयशपांढरकवडा : गेल्या तीन महिन्यापासून पांढरकवडा, राळेगाव व कळंब तालुक्यातील सिमावर्ती भागात एका पट्टेदार वाघाने धुमाकुळ घातला आहे. शेतकरी-शेतमजूरांवर सतत होत असलेल्या नरभक्षक वाघाच्या हल्ल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले असून या वाघाची दहशत अद्यापही कायम आहे. पांढरकवडा, राळेगाव व कळंब या तालुक्यातील सिमावर्ती भागात या नरभक्षक वाघाने मागील तीन महिन्यापासून चांगलाच धुमाकुळ घातला आहे. आतापर्यंत या वाघाने चार जणांचा बळी घेतला असून अनेकांना जखमी केले आहे. अनेक जनावरांनादेखील या वाघाने ठार मारले आहे. परंतु वनविभागाने या नरभक्षक वाघाचा अद्यापही बंदोबस्त न केल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात नरभक्षकवाघाने तीन जणांचा बळी घेतला. ४ सप्टेंबर रोजी राळेगाव तालुक्यातील खैरगाव कासार येथील शेतकरी मारोती विठोबा नागोशे आपल्या शेतात काम करीत असतांना अचानक हल्ला करुन त्याला ठार मारले. मारोती आपल्या पत्नीसह नेहमीप्रमाणे शेतात गेला होता. शेतकाम आटोपल्यानंतर दोघेही घराकडे निघाले होते. दरम्यान मारोतीने आपल्या पत्नीला घराकडे पाठविले व मी चारा घेऊन येतो म्हणुन तिला सांगीतले. परंतु बराच वेळ होत आला मारोती घराकडे आला नाही म्हणून गावकऱ्यांनी शोध घेतला असता, शेतापासून दीड किलोमिटर अंतरावर मारोतीचा मृतदेह आढळून आला. नरभक्षक वाघाने मारोतीला फरफटत नेऊन त्याची नरडी फोडलेली व पाय धडावेगळा असलेला आढळून आला.ही घटना घडून अवघे २४ तासही उलटत नाही तोच या नरभक्षक वाघाने पाचमोह जंगलात एका गुराख्याला ठार मारले. झोटिंगधरा ता.पांढरकवडा येथील सखाराम टेकाम हा ५० वर्षीय गूराखी ५ सप्टेंबर रोजी पाचमोह जंगलात गुरे चारावयासाठी गेला होता. परंतु बऱ्याच रात्री उशीरा पर्यंत तो परत न आल्यामुळे त्याचा शोध घेतला असता जंगलात एक गाय मृतावस्थेत आढळून आली व गाई शेजारीच सखारामचा मृतदेह आढळून आला. वाघाने सखारामच्या शरीराचे अक्षरश: लचके तोडले होते. सततच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात धास्ती भरली असतांनाच बोराटी येथील सोनूबाई वामन घोसले या ४५ वर्षीय महिलेला ती शेतात काम करीत असतांना नरभक्षक वाघाने हल्ला करुन तिला ठार मारले. या घटनांमुळे घास्तावलेल्या नागरिकांनी नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली.वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरच या वाघाचा बंदोबस्त करु. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही असे आश्वासन दिले. परंतु या नरभक्षक वाघाचा वनविभागाकडून अद्यापपर्यंत कोणताही बंदोबस्त करण्यात आला नाही. अशा प्रकारच्या घटना घडणे पुन्हा सुरुच आहे. पुन्हा ऐन दिवाळीच्या दिवशी तेजनी ता.राळेगाव येथील गुराखी प्रविण पुंडलिक सोनवणे या २५ वर्षीय गुराख्यावर नरभक्षक वाघाने हल्ला केला व चवथा बळी घेतला. रोजंदारीवर काम करणारा प्रविण हा दिवाळीच्या दिवशी आपल्या मालकाच्या गायी चारावयासाठी जवळच असलेल्या तेजनी-बोराटीच्या जंगलात घेऊन गेला होता.दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानक त्याच्यावरवाघाने हल्ला केला. त्याला दोन किलोमिटर फरफटत नेले व त्यातच त्याचा मृत्यु झाला.ही घटना घडत नाही तोच गेल्या पाच दिवसापुर्वी आठ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता घोरदडा येथील जंगलात गायी चारत असलेल्या तुळशीराम तानबा वाघाडे या ४५ वर्षीय गुराख्यावर नरभक्षक वाघाने हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले. त्याचे नशीब बलवत्तर होते म्हणुन तो बचावला. सततच्या या घटनांमुळे या परिसरात एव्हढी दहशत निर्माण झाली आहे की, आपल्या शेतात जायचीसुध्दा कोणाची हिम्मत होत नाही. शेतमाल काढायचा कसा, कपाशीची वेचनी कशी करायची याची चिंता शेतकऱ्यांना आणि शेत मजूरांना सतावत आहे. शेतात येण्यास शेतमजुर घाबरत असल्यामुळे काही प्रमाणात शेतीची कामेसुद्धा ठप्प पडल्याचे दिसून येत असून वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)