शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएसएनएल’ कर्मचाऱ्यांचा संप

By admin | Updated: April 23, 2015 02:14 IST

बीएसएनएल बचाओ-राष्ट्र बचाओ’ असा नारा देत भारत संचार निगमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे.

यवतमाळ : ‘बीएसएनएल बचाओ-राष्ट्र बचाओ’ असा नारा देत भारत संचार निगमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. या अंतर्गत बुधवारी येथे निदर्शने केली. बीएसएनएलच्या अस्तित्वासाठी ही लढाई असल्याचे संघटनेच्या नेत्यांनी सांगितले. शासनाच्या चुकीच्या धोरणाचे बळी भारत संचार निगम करत आहे. कुशल व अनुभवी तंत्रज्ञ असतानाही सामान्य नागरिकांना उत्कृष्ट सेवा मिळत नाही. भारत संचारला डावलून सरकार केवळ खासगी कंपन्यांच्या फायद्याचा विचार करत आहे. त्यांनाच नवीन सुविधा पुरविण्यासाठी प्राधान्य दिले जात असल्याचे मत या नेत्यांनी मांडले. आवश्यक उपकरणांची खरेदी त्वरित करावी, निदेशकांची रिक्त पदे भरावी, ४-जी सेवा प्रदान करण्याचा अधिकार द्यावा, स्पेक्ट्रमचे वाटप करताना उदार धोरण ठेवून बीएसएनएलकडून लायसन्स फी माफ करावी शिवाय मागील सहा हजार ७०० कोटी रुपये परत करावे, केंद्र-राज्य तथा पीएसयूला बीएसएनएलकडून सेवा घेणे अनिवार्य करावे, बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्ही तोट्यातील उद्योगांचे विलिनीकरण करू नये, बीएसएनएलच्या सेवांचा विस्तार करण्यासाठी आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी आहे. बंदमध्ये भारत संचारचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. बंदचे नेतृत्व नॅशनल फेडरेशन टेलिकॉम एम्प्लॉईज अधिकारी संघटनेचे नरेंद्र गद्रे, जिल्हाध्यक्ष सुनील बेनोडेकर, जिल्हा सचिव शंतनू शेटे यांनी केले. (वार्ताहर)