शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

चांदोरेनगरात कृत्रिम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:33 IST

नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या चांदोरेनगराची तहान भागविण्यासाठी प्राधिकरणाच्या नळासोबतच स्वतंत्र पाणीपुरवठा योजनाही आहे. या नळ योजनेच्या विहिरीला २२ फूट पाणी आहे. तरीही नगरपरिषदेच्या निष्काळजीपणाने ही विहीर बंद पडली आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठा विहिरीकडे दुर्लक्ष, टँकर फिरकेनाप्राधिकरणाचे नळ चढेना, नगर परिषदचे दुर्लक्ष

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या चांदोरेनगराची तहान भागविण्यासाठी प्राधिकरणाच्या नळासोबतच स्वतंत्र पाणीपुरवठा योजनाही आहे. या नळ योजनेच्या विहिरीला २२ फूट पाणी आहे. तरीही नगरपरिषदेच्या निष्काळजीपणाने ही विहीर बंद पडली आहे. या भागात मुबलक पाणी असूनही भीषण टंचाई निर्माण झाली आहे.मोहा विभागातील चांदोरेनगर ही सर्वात मोठी वसाहत आहे. या नगरासाठी पाणी पुरवठ्याची स्वतंत्र विहीर ग्रामपंचायतीने दिली होती. हा भाग नगरपरिषदेकडे हस्तांतरित झाला, तेव्हापासून टंचाईची स्थिती गंभीर झाली. पाणी पुरवठा विहिरीला २२ फूट पाणी आहे. या ठिकाणचे मोटारपंप बंद पडला. याबाबत नगरपरिषदेला सूचना केली. मात्र दोन महिन्यापासून दुर्लक्ष करण्यात येत आहे. आता ही मोटर विहिरीत पडली आहे. यामुळे ही पाणीपुरवठा योजना बंद आहे. प्राधिकरणाच्या नळाचे पाणी नगरात पोहचत नाही. खासगी बोअर आटले. संपूर्ण भिस्त टँकरवरच विसंबून आहे. नगरपरिषदेने या भागतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या नाही. जुनी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी तसदी घेतली नाही.ग्रामीण भागापेक्षाही वाईट अवस्था चांदोरेनगराची असल्याचे मत अर्चना वानखडे, विमल जाधव, सुरेखा साखरकर यांनी व्यक्त केले. या भागात पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आहे. पाण्याचे स्रोत उपलब्ध आहे. असे असतानाही त्याकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्या जाधव, ताराबाई चंदनकार, वंदना घुले यांनी केला. या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. महिन्यात दोन वेळा टँकर आला. २०० लिटर पाणी मिळाले. या पाण्यात काय होणार, असा प्रश्न सविता चावके, रत्नमाला तिखे यांनी उपस्थित केला. पाण्याच्या भीषण टंचाईने गावाकडे जाऊन कपडे धुण्याची वेळ आल्याचे मतही गृहिणींनी नोंदविले.खासगी टँकरही नंबर लावल्यावर येत नाही. त्यासाठी चार ते पाच दिवसाची प्रतीक्षा करावी लागते, असे मत प्राजक्ता बहाड यांनी नोंदविले. पाण्याच्या नियोजनात प्रशासन चुकले आहे. पावसाळ्यानंतर लगेच यावर उपाययोजना व्हायला हव्या होत्या. प्रत्यक्षात तसे घडले नाही. यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, असे रेखा चव्हाण, जयमाला तिखे, इंदू थाटे म्हणाल्या. आजपर्यंत कधीही पाण्यासाठी बाहेर जाण्याची वेळ आली नाही. मात्र यावर्षी रात्रीही पाण्यासाठी जावे लागते, असे मत शिवाणी हांडे, सुधा वानखडे, चंदा मार्इंदे, अनिता कवडे यांनी नोंदविले.आपल्या भागातले टँकर बंद झाले का?चांदोरेनगर परिसरात येणाऱ्या टँकरची संख्या घटली आहे. महिन्यात एखादा टँकर चुकून दिसतो. यामुळे या भागात पाण्याचे टँकर येणे बंद झाले काय, असाच प्रश्न या भागात शिरताच नागरिक विचारतात.पाण्यासाठी परीक्षाचयावर्षी प्रत्येक गृहिणीला डोक्यावर गुंड घेऊन लांबवर जाण्याची वेळ आली. पाणीटंचाई आहे म्हणून गाव सोडूनही जाता येत नाही. मुलांच्या परीक्षा आहे. रोजगाराचा प्रश्न आहे. यामुळे अनेक गृहिणींची अक्षरश: परीक्षाच सुरू आहे. पुरूष मंडळीला दररोजच्या कामासोबत पाण्यासाठी गावभर फिरावे लागत आहे, असे मत प्रमोद बहाड यांनी व्यक्त केले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई