शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

अर्ज घेतले खंडीभर, कर्ज वाटले छटाकभर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील होतकरू तरुणांकडून या योजनेच्या नावाखाली भरमसाट अर्ज मागविण्यात आले. प्रत्यक्षात तरुणांनी अर्ज केल्यानंतर  बँकेच्या कर्मचाऱ्यांनी वेगवेगळे बहाणे करून अर्धेअधिक अर्ज फेटाळून लावले. मात्र, रोजगार करण्याची मनापासून इच्छा असणे, हा महत्त्वाचा निकष कधीतरी लक्षात घेतला जाणार आहे की नाही, असा संतप्त सवाल तरुणांच्या मनात निर्माण झाला आहे. 

ठळक मुद्देमुख्यमंत्री रोजगार योजनेला बँकांकडून खो : तरुण कसे होणार आत्मनिर्भर?, स्वयंरोजगाराचे स्वप्न फोल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सरकारचे कामच मोठे अजब आहे. बेरोजगार तरुणांना उद्योग-धंदे करण्यासाठी कर्ज देतो, म्हणून योजना काढल्या जातात, पण तरुणांनी अर्ज केल्यावर ते केराच्या टोपलीत टाकले जातात. राज्य शासनाने सुरू केलेल्या  ‘मुख्यमंत्री रोजगार योजने’लाही यवतमाळातील बँकांकडून अशाच पद्धतीने वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. जिल्ह्यातील होतकरू तरुणांकडून या योजनेच्या नावाखाली भरमसाट अर्ज मागविण्यात आले. प्रत्यक्षात तरुणांनी अर्ज केल्यानंतर  बँकेच्या कर्मचाऱ्यांनी वेगवेगळे बहाणे करून अर्धेअधिक अर्ज फेटाळून लावले. मात्र, रोजगार करण्याची मनापासून इच्छा असणे, हा महत्त्वाचा निकष कधीतरी लक्षात घेतला जाणार आहे की नाही, असा संतप्त सवाल तरुणांच्या मनात निर्माण झाला आहे. जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत रोजगार योजनेसाठी तरुणांकडून कर्ज प्रस्ताव मागविले जातात. या दोन्ही यंत्रणा प्रस्तावांचा सांगोपांग अभ्यास केल्यानंतरच अशी कर्ज प्रकरणे बँकांकडे पाठवितात. आधीच तपासून आलेल्या या प्रस्तावांना बँकांची यंत्रणा मात्र जाणीवपूर्वक धडाधड नकार कळवित आहे. गेल्या वर्षभरात जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाने मुख्यमंत्री रोजगार योजनेसाठी १३३ प्रस्तावांचा लक्षांक असताना, त्यापेक्षा कितीतरी अधिक तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला. या मंडळाने वर्षभरात एकंदर ३५० कर्ज प्रस्ताव बँकांकडे पाठविले. मात्र, बँकांनी विविध कारणे देत, तब्बल ९४ प्रकरणे थेट नामंजूर केली, तर २२१ प्रकरणे वर्षभरापासून प्रलंबित ठेवली आहे. ३५० तरुण रोजगारासाठी प्रयत्न करीत असताना, केवळ ३५ जणांना नाममात्र कर्ज मंजूर केले. विशेष म्हणजे, मंडळाने बँकांकडे प्रस्ताव दिल्यानंतर महिनोंमहिने त्यावर निर्णयच घेतला जात नाही. त्यामुळेच आम्हाला वारंवार बँकांमध्ये भेटी द्याव्या लागत आहे. शुक्रवारी संपूर्ण दिवस पुसदमधील बँकांना भेटी देण्यातच गेला, अशी खंत  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जी.आर. इंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. जिल्हा उद्योग केंद्राने मुख्यमंत्री रोजगार योजनेसाठी ८८५ प्रस्तावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर, विविध बँकांकडे १,९८७ तरुणांचे कर्ज प्रस्ताव पाठविले. मात्र, बँकांनी यातील ८९३ प्रस्ताव नामंजूर करीत, केवळ १६८ प्रस्तावांना मंजुरी दिली, तर केवळ ३० प्रकरणांत प्रत्यक्ष रक्कम वाटप केल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नीलेश निकम यांनी दिली. पंतप्रधान योजनेकडेही दुर्लक्ष मुख्यमंत्री रोजगार योजनेप्रमाणेच यवतमाळातील बँकांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाचीही वाट लावली आहे. या योजनेतून खादी ग्रामोद्योग मंडळाने बँकांना १६१ प्रस्ताव दिले होते. मात्र, बँकांनी त्यातील ८८ प्रस्ताव नामंजूर करून, इतर ५७ प्रस्ताव वर्षभरापासून प्रलंबित ठेवले आहे. केवळ १९ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.

म्हणे, इथे व्यवसायाला वावच नाही ! 

स्वयंरोजगारासाठी तरुणांनी दाखल केलेले कर्जाचे बहुतांश प्रस्ताव फेटाळताना बॅंकांनी ‘इथे व्यवसायाला वावच नाही’ असेच कारण नमूद केले. याशिवाय संबंधित प्रस्ताव आमच्या बॅंकेच्या कार्यक्षेत्रात येत नाही. प्रस्ताव दाखल करताना आवश्यक कागदपत्रे नाही, अशी कारणेही बॅंकांनी प्रस्ताव फेटाळताना खादी ग्रामोद्योग मंडळाला ऑनलाईन कळविली. 

पांढरकवडा, घाटंजी, मारेगाव, झरीवर फोकसलाख उद्योगाला सध्या प्राधान्य दिले जात आहे. या उद्योगासाठी आलेले प्रस्ताव तातडीने मंजूर केले जात आहे. त्या दृष्टीने पांढरकवडा, घाटंजी, मारेगाव आणि झरी या परिसरात पळस वृक्षाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे येथील आदिवासी तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. - विजय भगत, जिल्हा व्यवस्थापक अग्रणी बॅंक  

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी