शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

वणी तालुक्यात तीन वर्षांत ८२ बालमृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 5:00 AM

वणी तालुका हा कोळसा खाणींनी व्यापला आहे. त्यामुळे या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात आरोग्याची समस्या अतिशय बिकट झाली आहे. त्यातून बालमृत्युचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य विभागाच्या मते, बाळाच्या जन्मानंतर त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. मात्र ग्रामीण भागात ती घेतली जात नाही. जन्मानंतर बाळाला उबदार वातावरणाची गरज असते.

ठळक मुद्देविविध कारणे : चालू आर्थिक वर्षात मात्र बालमृत्यूचे प्रमाण घटले

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यात गेल्या तीन वर्षांमध्ये शून्य ते एक वर्षे वयोगटातील ८५ बालमृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक ३२ बालमृत्यू सन २०१७-१८ मध्ये झाले आहेत.वणी तालुका हा कोळसा खाणींनी व्यापला आहे. त्यामुळे या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात आरोग्याची समस्या अतिशय बिकट झाली आहे. त्यातून बालमृत्युचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य विभागाच्या मते, बाळाच्या जन्मानंतर त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. मात्र ग्रामीण भागात ती घेतली जात नाही. जन्मानंतर बाळाला उबदार वातावरणाची गरज असते. मात्र अनेकदा असे वातावरण मिळत नाही. हायपो ग्लासीमीया, न्युमोनिया यासारख्या आजाराची बाधा नवजात बालकाला होते. त्यातून अनेकदा मृत्यू ओढवतो. सन २०१७-१८ या वर्षात वणी तालुक्यात तब्बल ३२ बालमृत्यू झालेत. सन २०१८-१९ मध्ये २६ बालमृत्यू झालेत, तर सन २०१९-२० (एप्रिल १९ ते डिसेंबर १९) या वर्षात २४ बालमृत्यू झाले. एकूण आकडेवारीवर नजर फिरविल्यास मागील वर्षात बालमृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते.वणी तालुक्यात शिरपूर, कायर, कोलगाव व राजूर कॉलरी अशी चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. परंतु रिक्तपदांमुळे ही आरोग्य केंद्र पांगळी झाली आहेत. चारपैकी कोलगाव व कायर येथे सर्वाधिक प्रसुती केली जाते. परंतु चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर रिक्तपदे आहेत. त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे.कोलगाव आरोग्य केंद्रात १ औषध निर्माण अधिकारी, १ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, १ कनिष्ठ लिपीक, १ नेत्र चिकीत्सा सहाय्यक, चार आरोग्य सेवक (पुरूष), पाच आरोग्यसेवक (महिला), १ वाहनचालक, तीन परिचर अशी १७ पदे रिक्त आहेत. उर्वरित तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचीही अशीच अवस्था आहे. कायर प्राथमिक आरोग्य केंद्रात ४२ पदे मंजूर असली तरी त्यातील तब्बल २० पदे रिक्त आहेत. उर्वरित दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांचे हेच हाल आहेत. कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने रुग्णांना हवी तशी आरोग्य सेवा मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.वणी तालुक्यात प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड असल्याने त्याचाही परिणाम बालकांच्या आरोग्यावर होत आहे. या भागात कोळसा खाणी असल्याने कोळशाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे कोळशाची धूळ सदैव वातावरणात पसरत असते. त्यातूनच अनेक बालकांना जन्मताच दमा या आजारांची बाधा होत आहे.८४ अर्भकांचा उदरातच झाला मृत्यूवणी तालुक्यात बालमृत्यूचे प्रमाण जसे अधिक आहेत. तसेच कमी दिवसात प्रसुती होण्याचे प्रमाणही जास्त आहे. यातून गेल्या तीन वर्षांत ८४ अर्भकांचा मातेच्या उदरातच मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल