शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
6
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
7
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
8
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
9
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
10
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
11
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
12
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
13
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
14
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
15
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
16
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
17
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
18
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
19
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
20
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
Daily Top 2Weekly Top 5

६५ टक्के शेतकरी पुनर्गठणाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: July 4, 2016 02:13 IST

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीककर्जाचे पुनर्गठण केले जात आहे. मात्र, यात तीन वर्षापेक्षा जास्त काळापासून थकित असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश नाही.

मदतीत भेदभाव : मागील पाच वर्षापासून कोणतीही मदत मिळाली नाही
दिग्रस : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीककर्जाचे पुनर्गठण केले जात आहे. मात्र, यात तीन वर्षापेक्षा जास्त काळापासून थकित असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश नाही. अशा वंचित शेतकऱ्यांची संख्या ६५ टक्के आहे. या शेतकऱ्यांना अजूनही मदतीची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील शेतकरी मागील अनेक वर्षांपासून नैसर्गिक संकटांशी झुंजताना आर्थिक परिस्थितीने पूर्णपणे खचला आहे. प्रसारमाध्यमांनी याला वाचा फोडल्यानंतर सरकारने उपाययोजना व अभियान सुरू केल्याचा आभास निर्माण केला. याचाच एक भाग म्हणजे श्ेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण होय. प्रत्यक्षात ज्यांची नियमित परतफेड होती, त्याच शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. तीन वर्षापेक्षा जास्त थकित शेतकऱ्यांना याचा काही लाभ नाही. यामध्ये जास्त जमीन असलेल्या श्ेतकऱ्यांचा समावेश आहे. वास्तविक पाहता जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचा खर्च तुलनात्मकदृष्ट्या अधिक असल्याने त्यांना ही मदत मिळणे गरजेचे होते. (प्रतिनिधी)

केवळ १५६० शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण
आघाडी सरकारच्या काळात व्याजमाफीची योजना राबविण्यात आली होती. त्याहीवेळेस या शेतकऱ्यांना थकित म्हणून वगळण्यात आले होते. आरडाओरडीनंतर यावर्षी कर्जाचे पुनर्गठण होत आहे. याचा लाभ चालू कर्जदार शेतकऱ्यांना मिळत आहे. तालुक्यातील १५६० सभासद शेतकऱ्यांना दहा कोटी ७३ लाख रुपये वाटप झाले. मात्र नऊ हजार २२६ शेतकरी अर्थात ६५ टक्के शेतकऱ्यांना छदामही मिळत नाही.

३५ कोटींचे कर्ज थकित
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या २५ सोसायटीमध्ये बारा हजार सभासद शेतकरी आहे. यातून नऊ हजार २२६ श्ेतकरी जुने थकीतदार आहेत. यामध्ये अधिकांश शेतकरी सधन आहेत. त्यांच्याकडे मुळ कर्ज ३५ कोटी ३७ लाख २३ हजार मुद्दल व व्याजाचे १० कोटी ८६ लाख १४ हजार रुपये थकित आहे.