शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६१ हजार शेतकऱ्यांना ४७ कोटींचा पीक विमा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 05:00 IST

गतवर्षीचा संपूर्ण हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. यामुळे विमा उतरविणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा होती. जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणाने दुष्काळी स्थिती जाहीर झाली होती. यामुळे हमखास विमा मिळेल, अशी आशा सर्वच शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात विमा कंपनीने ६१ हजार शेतकरी मदतीला पात्र ठरविले आहे. उर्वरित चार लाख सहा हजार शेतकरी या मदतीस अपात्र ठरविण्यात आले.

ठळक मुद्देसर्वाधिक मदत सोयाबीन उत्पादकांना : कापूस, ज्वारी, उडीद, मूग आणि तुरीलाही मदत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षी खरीप हंगामामध्ये पिकाचा विमा उतरविणाऱ्या ६१ हजार शेतकऱ्यांना ४७ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक मदतीस पात्र शेतकरी सोयाबीन उत्पादक असून कापूस, ज्वारी, उडीद, मूग आणि तूर उत्पादकांनाही पीक विम्याची मदत मिळणार आहे. विमा कंपनीने ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वळती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विमा उतरविणारे चार लाख शेतकरी या पीक विम्याला मुकले आहे. यवतमाळ जिल्ह्यात चार लाख ६७ हजार २१ शेतकऱ्यांनी तीन लाख ३६ हजार ५४९ हेक्टरसाठी विमा सुरक्षाकवच उभारले होते. त्याकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३५ कोटी रुपये विमा कंपनीकडे वळते केले होते. गतवर्षीचा संपूर्ण हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. यामुळे विमा उतरविणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा होती. जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणाने दुष्काळी स्थिती जाहीर झाली होती. यामुळे हमखास विमा मिळेल, अशी आशा सर्वच शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात विमा कंपनीने ६१ हजार शेतकरी मदतीला पात्र ठरविले आहे. उर्वरित चार लाख सहा हजार शेतकरी या मदतीस अपात्र ठरविण्यात आले. पात्र असलेल्या ६१ हजार शेतकऱ्यांना ४७ कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर करण्यात आली आहे. प्रत्येक मंडळामध्ये विम्याची ही रक्कम भिन्न आहे. याशिवाय, पात्र शेतकऱ्यांची संख्याही विभागण्यात आली आहे. कुठल्या शेतकऱ्यांना किती रुपयांची मदत मिळाली, याची माहिती कृषी विभागालाही सध्या उपलब्ध नाही. मिळालेली संपूर्ण रक्कम विमा कंपनीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली आहे. काही बँकांनी मदतवाटपाला सुरुवातही केली आहे. जिल्ह्यातील सर्वच पिके मदतीला पात्र ठरली आहे. जिल्ह्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सर्वाधिक संख्या मदतीला पात्र ठरली आहे. एक लाख ९७ हजार ५१० शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. यातील २५ हजार ४०४ शेतकरी मदतीला पात्र ठरले आहे. या शेतकऱ्यांना २४ कोटी रुपयाचा विमा मंजूर झाला आहे.  तर, एक लाख सात हजार ६६ शेतकऱ्यांनी कापसाचा विमा उतरविला होता. यातील दहा हजार ६८४ शेतकरी मदतीला पात्र ठरले आहे. त्यांना १२ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. ज्वारीचे उत्पादन घेणाऱ्या ४३ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला. यातील दहा हजार ५९ शेतकरी मदतीला पात्र ठरले आहे. त्यांना तीन कोटी ९२ लाख रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. उडिदाचे उत्पादन घेणाऱ्या २६ हजार शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला होता. यातील ३२२ शेतकरी पात्र ठरले आहे. त्यांना सहा लाख ७९ हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. मुगाची लागवड करणाऱ्या २६ हजार ९१७ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. यामधील १४५३ शेतकरी मदतीला पात्र ठरले आहे. त्यांना २८ लाख ४४ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. तुरीची लागवड करणाऱ्या ६७ हजार शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला होता. यामध्ये १३ हजार शेतकरी मदतीस पात्र ठरले आहे. या शेतकऱ्यांना सहा कोटी ६३ लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. इतर शेतकऱ्यांना मदतीला मुकावे लागले आहे.  

असे आहेत मदतीला पात्र ठरलेले तालुक्यातील शेतकरी 

 आर्णी तालुक्यात ९२५ शेतकऱ्यांना ५१ लाख १५ हजार ९१५ रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. बाभूळगाव चार हजार १२५ शेतकरी, चार कोटी ५९ लाख. दारव्हा एक हजार ९० शेतकरी ८६ लाख २३ हजार. दिग्रस १६९३ शेतकरी, १ कोटी २३ लाख. घाटंजी १६ हजार २१५ शेतकरी, १६ कोटी ६८ लाख. कळंब तीन हजार ९३ शेतकरी, एक कोटी २८ लाख. केळापूर सात हजार ४३२ शेतकरी, सात कोटी ४६ लाख. महागाव चार हजार ६९० शेतकरी, एक कोटी ५६ लाख. मारेगाव दोन हजार ४५४ शेतकरी, ८३ लाख. नेर ५०३ शेतकरी, ४६ लाख ९२ हजार. पुसद दोन हजार ९३ शेतकरी, एक कोटी ८७ लाख. राळेगाव दोन हजार २८१ शेतकरी, एक कोटी ४७ लाख. उमरखेड सात हजार ६६३ शेतकरी, चार कोटी आठ लाख. वणी १५६८ शेतकरी, ६७ लाख. यवतमाळ चार हजार १०० शेतकरी, दोन कोटी ८७ लाख. झरी जामणी १३६४ शेतकरी, ६९ लाख.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी