शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

१७ टँकरने भागविली जाते ग्रामीण भागाची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:48 IST

पाणीटंचाईने होरपळणाºया ग्रामीण भागावर १७ टँकरच्या माध्यमातून प्रशासनाने फुंकर मारण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर उपाययोजनेच्या नावाखाली सव्वाशे विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

ठळक मुद्दे१२५ विहिरींचे अधिग्रहण : प्रशासनाच्या उपाययोजना तोकड्याच

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : पाणीटंचाईने होरपळणाºया ग्रामीण भागावर १७ टँकरच्या माध्यमातून प्रशासनाने फुंकर मारण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर उपाययोजनेच्या नावाखाली सव्वाशे विहिरींचे अधिग्रहण केले आहे. गावागावांत पाणीटंचाई उग्ररुपधारण करीत असताना ग्रामीण जनतेच्या संयमाचा बांध आता फुटू पाहत आहे.यावर्षी अपुन्या पावसामुळे जिल्ह्यात फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाई निर्माण झाली. मात्र प्रशासन नेहमीप्रमाणे झोपेत असल्याने तहाण लागल्यानंतर विहीर खोदण्याची उपाययोजना केली जात आहे. दरवर्षी किमान आॅक्टोबरमध्ये कृती आराखडा तयार होणे अपेक्षित असताना तब्बल डिसेंबर-जानेवारी उलटून गेल्यानंतरही आराखडा कागदारवच होता. त्यामुळे भीषण पाणीटंचाईत उपाययोजना करताना आता प्रशासनाच्याच नाकीनऊ येत आहे.जिल्हा परिषदेने दहा कोटी ७९ लाख ६६ हजारांचा कृती आराखडा तयार केला. मात्र त्यातील उपाययोजना आता कुठे सुरू झाल्या. याच आराखड्यातून जिल्ह्यात सध्या १७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात दहा शासकीय आणि सात खासगी टँकरचा समावेश आहे. गणेशवाडी, नांझा, करजगाव, तोरनाळा, कोहळा, तेलगव्हाण, पांढरी, धानोरा बोथ, इचोरी, जांभुळणी, सारफळी, पेटूर, झोबाडी, खरडगाव, सातेफळ, ब्राम्हणगाव, फुलसावंगी आणि टेंभुरदरावासीयांची तहान या टँकरवर अवलंबून आहे.पाणीटंचाई निवारणार्थ ६७२ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. आत्तापर्यंत १२५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात दारव्हा २५, उमरखेड २५, नेर १४, कळंब ९, यवतमाळ १६, पांढरकवडा १, बाभूळगाव ३, दिग्रस १६, वणी ४, तर आर्णी तालुक्यात १३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पुसद, रोळेगाव, घाटंजी, महागाव आणि मारेगाव तालुक्यात अद्याप एकाही विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले नाही.यावर्षी केवळ ६१४ मिलीमीटर पाऊसजिल्ह्यात वर्षभरात सरासरी ९११.३४ मिलीमीटर पाऊस पडतो. यावर्षी जिल्ह्यात केवळ ६१४.९३ मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे प्रशासनाने ६७० गावांकरिता ९०३ उपाययोजनांसाठी १० कोटी ७९ लाख ६६ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार केला. तसेच महाराष्टÑ भूजल अधिनियम २००९ नुसार जिल्ह्यातील १५ तालुक्यातील १६३ गावे पाणी टंचाई क्षेत्र म्हणून घोषित केले. सोबतच विविध प्रकल्पातील ८१.७१ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे.एप्रिल, मेमध्ये प्रशासनाची अग्निपरीक्षामार्च महिन्यातच पाणीटंचाईचे भडके उडत असल्याने एप्रिल आणि मे महिन्यात प्रशासनाची अग्निपरीक्षा होणार आहे. कृती आरखाड्यानुसार एप्रिल ते जून दरम्यान ३१० खासगी विहिरी अधिग्रहीत कराव्या लागणार आहे. सोबतच तब्बल ५१ टँकर सुरू करावे लागणार आहे. त्यामुळे एप्रिलपासून प्रशासनाची खरी अग्निपरीक्षा आहे. विहिरींना पाणीच नसल्यास प्रशासन नागरिकांची तहान कशी भागविणार, असा प्रश्न आहे. यातून कोणता मार्ग काढला जातो, याकडे ग्रामीण भागाचे लक्ष आहे.असे आहेत पाण्याचे स्त्रोत२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ६७ हजार ७४४ आहे. या नागरिकांसाठी जिल्ह्यात एकूण ११४३ नळ योजना आहेत. तब्बल ६४१ हातपंप आहेत. संपूर्ण जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या ४३४३ विहिरी आहेत. याशिवाय २६६ ठिकाणी सौर पंपाव्दारे पाणीपुरवठा केला जातो. तरीही यावर्षी अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील किमान ६७० गावांमध्ये पाणीटंचाई आहे.

टॅग्स :Waterपाणी