Next

गिरीश महाजनांचा जयंत पाटील, मलिकांना टोमणा Girish Mahajan | Jayant Patil | Nawab Malik

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 04:10 PM2021-12-01T16:10:52+5:302021-12-01T16:11:13+5:30

शिवसेना-भाजपची युती उभ्या महाराष्ट्राने पाहिली. पक्ष वेगवेगळे असले तरी नेते मात्र अगदी एकोप्याने राहत होते.. पण २०१४ नंतर या युतीला तडे गेले आणि २०१९ नंतर युती तुटलीच. त्याचीच खदखद वेळोवेळी दोन्ही पक्षातील काही नेते व्यक्त करत असतात.. आता भाजप नेते गिरीश महाजनांनी हे बोलून दाखवलं. गेल्या २५ वर्षांपासून राज्यात शिवसेना-भाजप युतीचा चांगला संसार सुरु होता. मात्र, जयंतराव आपण २५ वर्षांचा संसार मोडून टाकला, असा टोला माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना लगावला. तर आपण Girish Mahajan यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नसल्याचे जलसंपदा मंत्री Jayant Patil म्हणाले..