Next

चीनने Shri Lanka ला चिथावलं; भारताचा समुद्री मार्गही अडवला | China blocked India's sea Route?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 02:19 PM2021-09-07T14:19:02+5:302021-09-07T14:19:41+5:30

जमीन असोत की समुद्र.. चीन सातत्यानं भारताला घेरण्याचा प्रयत्न करतोय. आता भारताच्या व्यापारी जहाजांसाठी चीननं नवीन नियम आणलाय, कारण आता चीनला समुद्रात वसुली करायचीय. इतक्यावरच चीन थांबत नाहीये, चीन श्रीलंकेला भारताविरोधात फितवतोय. श्रीलंकेला चीननं अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीचं आमिष दिलंय. भारतीय किनारपट्टीपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर चिनी गुंतवणूक असेल. स्ट्रॅटेजिकली चीन कुठे गुंतवणूक करणार आहे आणि समुद्रात चीन वसुली करायला लागलाय..म्हणजे नेमकं काय करतोय.. भारतीय जहाजांवर-व्यापारावर त्याचा कसा परिणाम होतोय.. हे आपल्याला जाणून घ्यायचंय पुढच्या ५ मिनिटात.