अहमदनगर : शिरसमार्ग ( ता. गेवराई, जि. बीड) येथील श्री दत्त प्रतिष्ठानचे तरुण एकवीरा देवीहून देवीची ज्योत घेऊन पायी नगरमार्गे बीडकडे निघाले होते. दुपारी ते काही वेळ पावसामुळे भिंगारला थांबले. मात्र घटस्थापनेला उद्या ज्योत गावी नेणे गरजेचे होते. बंधा-यावरून पाणी वाहत असतानाही तरुणाने ज्योत हाती घेऊन रस्ता पार केला. ज्योत नेण्यासाठी सोबत ४० जणांचा ग्रुपही वाहनातून प्रवास करीत आहे. काही तरुण वाहनात तर काही पायी आहेत.