शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

वाशिम जिल्ह्यात शेत मशागतीची कामे प्रलंबित !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2018 5:13 PM

खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकºयांनी अद्याप पिकपेरणीसाठी जमिनींची मशागत करण्याची साधी तयारी देखील केलेली नाही.

वाशिम : खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतक-यांनी अद्याप पिकपेरणीसाठी जमिनींची मशागत करण्याची साधी तयारी देखील केलेली नाही. तुरीच्या शेंगा काढून घेतल्यानंतर शिल्लक राहणा-या तुराट्या आजही अनेक शेतांमध्ये तशाच दिसून येत आहेत. तथापि, नैसर्गिक आपत्तीसह उद्भवलेल्या विविध स्वरूपातील संकटांमुळे शेतकरी अक्षरश: जेरीस आल्यानेच आगामी खरिप हंगामात पेरणीचे प्रमाण घटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.दरवर्षी साधारणत: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काडी-कचरा वेचणे, वखरणी, नागरणी, कोळपणी यासह इतर स्वरूपातील शेत मशागतीची कामे सुरू होतात. यंदा मात्र जिल्ह्यातील अर्ध्याअधिक पेरणीलायक क्षेत्रावर ही कामे सुरू झालेली नाहीत. गत महिन्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान अवकाळी पावसासह झालेल्या गारपीटीमुळे अनेक शेतक-यांच्या गहू, हरभरा व काही प्रमाणात तुरीचे अतोनात नुकसान झाले. त्यातच शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसून शासनाकडून मिळालेल्या कर्जमाफीचाही विशेष फायदा झाला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्याचा परिणाम आगामी खरिप हंगामावर जाणवण्याची शक्यता असून जवळ पैसाच नसल्याने शेत मशागत आणि पेरणीसाठी लागणा-या साहित्यांची जुळवाजुळव कशी करणार, असा प्रश्न शेतक-यांसमोर उपस्थित झाला आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी