शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

‘वॉटर न्यूट्रल’ ठरलेल्या गावातही पाणीटंचाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 4:01 PM

वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाण्याची गरज पूर्ण झाल्याच्या सर्वेक्षणाअंती जिल्ह्यातील तब्बल ४६९ गावे ‘वॉटर न्यूट्रल’ ठरली आहेत.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाण्याची गरज पूर्ण झाल्याच्या सर्वेक्षणाअंती जिल्ह्यातील तब्बल ४६९ गावे ‘वॉटर न्यूट्रल’ ठरली आहेत. वॉटर न्यूट्रल ठरलेल्या जवळपास १०० पेक्षा अधिक गावांत तिव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने कृषी विभागाच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड झालेल्या गावांत नाला रुंदीकरण, सरळीकरण, खोलीकरण, नाला बांधाचे खोलीकरण, कोल्हापुरी व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे, तलावातील माती व नालाबांधातील गाळ काढणे, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, पिण्याच्या पाण्याचे स्रोत तसेच पाणी वापर संस्थाचे बळकटीकरण आदी कामे पूर्ण केली जाते. सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांमध्ये, सन २०१६-१७ मध्ये १४९ आणि सन २०१७-१८ मध्ये १२० गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. जलसंधारणाची विविध कामे करण्यात आल्याने उपरोक्त ४६९ गावांची पाण्याची गरज पूर्ण झाल्याचे दाखवून या ४६९ गावांचा समावेश ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये करण्यात आला. जिल्ह्यात एकूण ७९३ महसूली गावे असल्याने आणि कृषी विभागाच्या लेखी ४६९ गावांची पाण्याची गरज पूर्ण झालेली असल्याने उर्वरीत ३२४ गावांत पाणीटंचाई निर्माण होणे अपेक्षीत होते. मात्र, जिल्हा प्रशासनानेच जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक गावांत पाणीटंचाई जाहिर करून कोट्यवधी रुपयांच्या उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. त्यामुळे येथे नेमकी चुक कुणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ४६९ गावांची पाण्याची गरज पूर्ण झालेली असेल तर ५०० गावांत कोणत्या आधारावर पाणीटंचाई जाहिर करण्यात आली आणि ५०० गावांत खरोखरच पाणीटंचाई असेल तर ४६९ गावांचा समावेश ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये कोणत्या आधारावर करण्यात आला, या दृष्टिने पडताळणी होणे आवश्यक ठरत आहे.

वॉटर न्यूट्रल यादीतील गावांचे फेरसर्वेक्षण झाल्यास वस्तुस्थिती येईल समोर !शेती प्रयोजनाकरिता लागणाºया पाण्यासह जनावरे, गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्याकरिता जलयुक्त शिवार अभियानातून गावागावांत जलसंधारणाची कामे केली जात आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या तालुकास्तरीय समितीकडून सर्वेक्षण केले जाते. या समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी तर सचिव म्हणून तालुका कृषी अधिकारी असतात. त्या-त्या गावाची ‘वॉटर न्यूट्रल’ टक्केवारी काढली जाते. १०० टक्केवारी असलेल्या गावाची पाण्याची गरज पूर्ण झाल्याची शहानिशा केली जाते. त्यानंतरच संबंधित गावाचा ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये समावेश केला जातो. वॉटर न्यूट्रल ठरलेल्या जिल्ह्यातील अनेक गावांत पाणीटंचाई असल्याने फेर सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी अनेकवेळा केली. मात्र, अद्याप फेर सर्वेक्षण करण्यात आले नाही.

सन २०१५-१६ मध्ये २०० गावांमध्ये, सन २०१६-१७ मध्ये १४९ आणि सन २०१७-१८ मध्ये १२० गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. ही सर्व गावे वॉटर न्यूट्रल ठरली आहेत. सन २०१८-१९ या वर्षात २५२ गावांमध्ये जवळपास १४०० कामे पूर्ण झाली आहेत.- दत्तात्रय गावसानेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई