शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्ष्यांसाठी निर्माण केले पानवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 18:39 IST

निसर्गप्रेमी सावली प्रतिष्ठानने अभिनव उपक्रम हाती घेतला असून शहरातील निर्जळ व दाट झाडे व पक्षांचा राबता असलेल्या विविध ठिकाणी अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हजारो पाणवठे या निसर्ग प्रेमींनी निर्माण केले आहेत.

वाशीम : दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्या वाचून पक्षांची होणारी तळमळ थांबावी याकरिता वाशीम येथील निसर्गप्रेमी सावली प्रतिष्ठानने अभिनव उपक्रम हाती घेतला असून शहरातील निर्जळ व दाट झाडे व पक्षांचा राबता असलेल्या विविध ठिकाणी अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हजारो पाणवठे या निसर्ग प्रेमींनी निर्माण केले आहेत. यामुळे पक्षांना त्याची वस्ती असणाऱ्या ठिकाणी पाणी उपलब्ध होऊन त्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे. वाशीम येथील सावली प्रतिष्ठान या निसर्ग व्यासंगी गृपच्यावतीने दिवसेंदिवस होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे प्रदूषण आणि जागतिक उष्मांकाचा आकडा वाढत असल्यामुळे अनेक पक्षी दुर्मिळ होत चालले,अनेक पक्षी आणि प्राणी मात्रांचे जीवन धोक्यात आलेत म्हणून निसर्गाशी व प्राणीमात्रांविषयी जवळीक साधून निर्सग व्यासंगी मंडळींनी पुढे येवून या संकटाचा वेळीच सामना करणे अत्यंत करणे गरजेचे आहे. भविष्यात चिमणी हा प्राणी कसा असतो हे सांगण्याची वेळ येवू नये म्हणून सावली प्रतिष्ठानच्यावतीने विविध पर्यावरणपूरक कार्यक्रमाचे आयोजन गत काही वर्षापासून करण्यात येत आहे. पक्ष्यासाठी पाणपोई हा उपक्रम शहरात राबविण्यासाठी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी साहित्य जमा करण्यासाठी टाकाऊ वस्तुंचा वापर केला, त्यामध्ये रेल्वे स्थानकावर फेकून दिलेल्या रिकाम्या पाण्याच्या बॉटल्स जमा करण्यात आल्या ,शेतातील साधारण: सुकलेल्या तुरीच्या खोडक्या जमा करुन त्यापासून तिपाई तयार करण्यात आली, जेवढे पाणी कमी झाले तेवढाच पाण्याचा पुरवठा मातीच्या भांड्यात होण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले. भांडयातील पाणी जास्तीत जास्त टिकण्यासाठी सी.एस.एल. या तंत्राचा वापर प्रत्येक पाणपोईला करण्यात आला आहे.

निसर्ग व्यासंग वृध्दिंगत होउन पर्यावरण संवर्धन चळवळीला गती देण्यासाठी सावलीने बच्चे कंपनीला सहभागी करून निसर्ग व्यासंगाचे बाळकडूच दिले आहेत. बच्चे कंपनी देखिल या उपक्रमाचा नैसर्गिक आनंद घेत आहेत. आजवर आपल्या घरात वावरायची अंगणात धान्य निवडताना चार दाणे टाकले की पक्षाचा थवा हमखास तो टिपायला जवळ यायचा आणि भुर्रकन उडूनही जायच्या अंगणात घराच्या आडोशाला अगदी भिंतीवर टांगलेल्या फोटोंच्या मागे पक्षी घरटे सहज तयार व्हायचे असे मात्र आता कुठेही दिसत नसल्याचे चित्र आहे. मुक्या जीवांची तृष्णातृप्ती करण्यासाठी नागरीकांनी पानवठ्यात पाणी भरण्याचे आवाहन सावली प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीव