शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

लघू प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 4:29 PM

आसेगाव (वाशिम): पावसाळा उलटून दोन महिनेही होत नाही, तोच आसेगाव परिसरातील लघू प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव (वाशिम): पावसाळा उलटून दोन महिनेही होत नाही, तोच आसेगाव परिसरातील लघू प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून, रब्बी हंगामातील गहू पिकालाही पुढे सिंचनासाठी पाणी मिळणार की नाही, अशी भिती यामुळे निर्माण झाली आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस पडल्याने आसेगाव परिसरातील प्रकल्प शंभर टक्के भरले होते. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते. प्रकल्प काठोकाठ भरल्याने शेतकºयांनी रब्बी हंगामाची पेरणी झपाट्याने उरकली. यंदा या परिसरात गतवर्षीच्या तुलनेत रब्बीच्या क्षेत्रात मोठी वाढली झाली. तथापि, पावसाळा संपून दोन महिने होत नाही तोच परिसरातील प्रकल्पांची पातळी झपाट्याने खालावत चालली आहे. आसेगाव परिसरातील आसेगाव बांध, तसेच सार्सी, चिंचखेड, पिंपळगाव, नांदगाव येथील लघू प्रकल्पात सद्यस्थितीत ६० टक्क्यांच्या जवळपास जलसाठा शिल्लक आहे. प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने होत असलेली घट पाहता. रब्बी हंगामातील गहू पिकाच्या सिंचनासाठी पुढे पाणी मिळेल की नाही, अशी भिती शेतकºयांना वाटू लागली आहे. या प्रकल्पांच्या भरवशावरच शेकडो शेतकºयांनी हरभरा, गहू पिकाची पेरणी केली आहे. आता प्रकल्पात होणारी घट पाहता यंदाच्या उन्हाळ्यातही पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :washimवाशिमDamधरण