शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचे संकट टळले; रब्बीतील सिंचनाचा प्रश्न कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 12:50 IST

जोरदार पावसामुळे सर्वच धरणांची पाणीपातळी ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गुरूवार आणि शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वच धरणांची पाणीपातळी ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न पूर्णत: निवळला; मात्र वार्षिक पर्जन्यमानात ३० टक्के तूट अद्याप कायम असल्याने आगामी रब्बी हंगामातील सिंचनाचा प्रश्न कायमच असल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकृत सूत्रांनी शनिवारी दिली.जिल्ह्यात एकबुर्जी, सोनल आणि अडाण असे तीन मध्यम प्रकल्प असून १३१ लघू प्रकल्प आहेत. त्यापैकी पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेले वरुड, जुमडा, कोकलगांव, अडगांव, गणेशपूर, राजगांव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर हे अकराही बॅरेज सद्या तुडूंब भरले असून त्याचे दरवाजे अधूनमधून उघडण्यात येत आहेत. याशिवाय वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाची पातळी ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. सोनल आणि अडाण या मध्यम प्रकल्पांमध्येही पिण्यासाठी आगामी एक वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा निर्माण झाला आहे. १३१ लघूप्रकल्पांपैकी काही प्रकल्प तुडूंब झाली असून बहुतांश प्रकल्पांची पाणीपातळी ५० ते ६० टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. जिल्ह्यातील विहिरी, कुपनलिका, तलाव या अन्य स्वरूपातील जलस्त्रोतांच्या पातळीतही बºयापैकी वाढ झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निवळली आहे.असे असले तरी ७९८.७० मिलीमिटर या वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत १४ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत जिल्ह्यात ५६९.५९ मिलीमिटरच पाऊस कोसळला असून ३० टक्के तूट भरून निघण्याची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. त्याचा परिणाम प्रामुख्याने आगामी रब्बी हंगामातील सिंचनावर होणार आहे.

सर्वात कमी पाऊस वाशिममध्येजिल्ह्यातील एकाही तालुक्याने यंदा आतापर्यंत पर्जन्यमानात वार्षिक सरासरी गाठलेली नाही. त्यातही वाशिम तालुक्यात सर्वात कमी पाऊस (६३.९८ टक्के) असून सर्वाधिक पावसाची नोंद मालेगाव तालुक्यात (८०.८ टक्के) झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पर्जन्यमान ७१.३१ टक्के आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या पावसामुळे सर्व धरणांची पातळी सरासरी ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बहुतांशी निकाली निघाला आहे; मात्र एवढ्या पाण्यावर आगामी रब्बी हंगामात सिंचनाचा प्रश्न निकाली निघणार नाही.- प्रशांत बोरसेकार्यकारी अभियंता, जलसंपदा

 

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसDamधरण