शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

वाशिम : रिसोड तालुक्यातील मसलापेन बॅरेजचा प्रश्न मार्गी लागणार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 3:58 PM

रिसोड : रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील बºयाच दिवसांपासून प्रलंबित असलेला मसलापेन बॅरेजचा प्रश्न लवकरच निकाली निघण्याची चिन्हे आहेत. १२ डिसेंबरला नागपूर येथे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या वाशिम जिल्हा आढावा बैठकीत मसलापेन बॅरेजसंदर्भात मार्च २०१८ पर्यंत सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावाची कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

ठळक मुद्देलखनसिंह ठाकूर यांचा पाठपुरावा शेतक-यांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील ब-याच दिवसांपासून प्रलंबित असलेला मसलापेन बॅरेजचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची चिन्हे आहेत. १२ डिसेंबरला नागपूर येथे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या वाशिम जिल्हा आढावा बैठकीत मसलापेन बॅरेजसंदर्भात मार्च २०१८ पर्यंत सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावाची कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. या बॅरेजसंदर्भात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी पाठपुरावा केला.रिसोड तालुक्यातील बाळखेड, धोडप, किनखेडा परिसरातून गेलेल्या पैनगंगा नदीवर बॅरेज निर्माण झाले तर याचा फायदा शेकडो शेतक-यांना होऊ शकतो, हा मुद्दा उचलून धरत लखनसिंह ठाकूर यांनी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मार्गदर्शनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. मध्यंतरी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यास दिरंगाई होत असल्याने ठाकूर यांनी शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन चर्चा केली. ना. गडकरी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री महाजन यांना दिल्यानंतर, २८ नोव्हेंबर रोजी जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात आमदार राजेंद्र पाटणी, लखनसिंह ठाकुर तसेच जलसंपदा विभागाचे मुुख्य अभियंता व पाटबंधारे अधिकाºयांसोबत चर्चाही झाली होती. या चर्चेत पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्यातील विलंब दूर झाला होता. १२ डिसेंबर रोजी नागपूर येथील आढावा बैठकीत यासंदर्भात आमदार राजेंद्र पाटणी यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांनी मार्च २०१८ अखेरपर्यंत सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावाची कार्यवाही करुन जून २०१९ पर्यंत हा प्रश्न संपूर्णपणे निकाली काढला जाईल असे सांगितले. बॅरेजचा प्रश्न निकाली निघत असल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापुढेही पाठपुरावा सुरूच ठेवू, असे ठाकूर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी