शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम हे जागतिक कथा साहित्याचे जन्मस्थान

By admin | Updated: February 17, 2015 01:40 IST

प्रा. हरी नरके यांचे प्रतिपादन, वाशिम येथे ग्रंथोत्सवाचे उद्घाटन.

वाशिम : वाशिमचा सुपुत्र असलेल्या महाकवी गुणाढय़ यांनी दोन हजार वर्षांपूर्वी ह्यबृहतकथाह्ण हा कथासंग्रह लिहून ह्यकथाह्ण या साहित्यप्रकाराला जन्म दिला. त्यामुळे वाशिम हे कथा साहित्याचे जन्मस्थान आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या सहकार्याने ह्यमहाकवी गुणाढय़ नगरीह्णमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी हे होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. किरणराव सरनाईक, भाऊसाहेब सोमटकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे, बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर वैद्य, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. नरके पुढे म्हणाले, महाकवी गुणाढय़ यांचा जन्म वाशिम येथे झाला. वत्स व गुल्मक हे महाकवी त्यांचे मामा होते. महाकवी गुणाढय़ यांनी पैशाची या भाषेत सुमारे ७0 लाख ोकांचे लेखन केले होते. त्यापैकी आता केवळ १0 लाख ोकांचा समावेश ह्यबृहतकथाह्ण या कथासंग्रहात असून, याचे पाच खंड आहेत. यासोबतच ह्यपंचतंत्रह्ण, ह्यसिंहासन बत्तिशीह्ण यासारख्या सुप्रसिद्ध कथांचे लेखनही त्यांनी केले आहे. या कथांमधून त्यांनी नीतीमत्ता, बोध, शिक्षण, ज्ञान याची मांडणी केली आहे. त्यामुळे दोन हजार वर्षांपूर्वीही मराठी भाषा किती समृद्ध व संवेदनशील होती, याची प्रचिती येते. महाकवी गुणाढय़ यांनी पैशाची भाषेत लिहिलेल्या या लेखन साहित्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे, असे मतही यावेळी प्रा. नरके यांनी व्यक्त केले.