शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

घाटा गावची वाट झाली बिकट; शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 3:42 PM

वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाºया घाटा (ता.मालेगाव) या गावाकडे पांगरखेडा येथून जाणारी वाट अत्यंत बिकट झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रगतीशिल शेतकऱ्यांचे तथा वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाºया घाटा (ता.मालेगाव) या गावाकडे पांगरखेडा येथून जाणारी वाट अत्यंत बिकट झाली असून शेतात पिकणारा माल विक्रीसाठी बाजारपेठेत नेताना शेतकऱ्यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो. असे असताना रस्त्याच्या तद्वतच अन्य स्वरूपातील विकासाच्या मागणीकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.कृषी क्षेत्रात झपाट्याने प्रगती करणाºया मालेगाव तालुक्यातील निवडक गावांमध्ये घाटा या गावाचा अग्रक्रम लागतो. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये या गावातील शेतकºयांकडून विक्रमी उत्पन्न घेतले जात आहे. सिंचनासाठी पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी बहुतांश शेतकºयांनी शेततळे घेतल्याने पाण्याचा प्रश्न मिटला असून शेतमालाच्या सरासरी उत्पादनात वाढ झाली आहे; मात्र शेतात पिकणारा माल बाजारपेठेत पोहचविण्याकरिता घाटा या गावाला पांगरखेडामार्गे शिरपूर अशा रस्त्याची उपलब्धी अद्यापपर्यंत मिळाली नाही. यामुळे विविध स्वरूपातील अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. घाटा ते पांगरखेडा फाट्यापर्यंत पक्की सडक उभारण्याची मागणी सरपंच फलांगा रमेश चव्हाण यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी केली. घाटा या गावापासून पांगरखेडा फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर अनेक प्रयोगशिल शेतकºयांची शेती वसलेली आहे. तसेच पांगरखेडा फाट्यापासून काही अंतरावर नागपूर ते औरंगाबाद हा महामार्ग आहे. या फाट्यापासून शिरपूरमध्ये जाण्याकरिता केवळ चार किलोमिटरचे अंतर पार करावे लागते; मात्र हा रस्ता लालफितशाहीत अडकून असल्याने सद्या घाटा ते किन्ही घोडमोड आणि तेथून शिरपूर असे मोठे अंतर पार करावे लागत आहे. यामुळे विशेषत: शेतकºयांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :washimवाशिमpwdसार्वजनिक बांधकाम विभागFarmerशेतकरी