शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘अवकाळी’चे ढग दाटले; उन्हाळी पिके धोक्यात! पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By संतोष वानखडे | Updated: May 15, 2024 16:08 IST

मंगळवार, १४ मे रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.

वाशिम : मे महिन्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसत असल्याने उन्हाळी पिकांना जबर फटका बसत आहे. मंगळवार, १४ मे रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.

जिल्ह्यात सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असलेले शेतकरी रब्बी हंगामानंतर उन्हाळी पिकांना पसंती देतात. यंदा उन्हाळी पीक पेऱ्यातही लक्षणीय वाढ झाली. जिल्ह्यात सरासरी ५९५४.९५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी अपेक्षीत असताना, प्रत्यक्षात ७९०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. यंदाच्या उन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमुग, उन्हाळी मुग व उडीद, सोयाबीन, ज्वारी, तीळ, मका या पिकांवर शेतकऱ्यांचा भर अधिक होता. यंदा उन्हाळ्यात मार्च ते १३ मे पर्यंत अधूनमधून गारपिट, वादळवारा व अवकाळी पाऊस झाल्याने उन्हाळी पिकांना फटका बसला. १४ मे रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास वाशिमसह जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने मूग, उडीद, सोयाबीनसह फळबागेलाही फटका बसला.

मालेगाव तालुक्यात जवळपास दीड तास अवकाळी पाऊस झाल्याने मूग पिकाची प्रचंड नासाडी झाली. पांगरी नवघरे परिसरात शेतात कापणी करून ठेवलेले मूग पीक संपूर्णत: भिजले. कापणी करून ठेवलेल्या या मूग पिकाच्या गंजीला १५ मे रोजी शेतकऱ्यांनी फेरबदल करीत पीक वाचविण्यासाठ धावपळ केल्याचे दिसून आले. वादळवाऱ्यामुळे मालेगाव ते वाशिम या महामार्गावरील काही झाडे उन्मळून पडल्याने रात्रीच्या सुमारास काही वेळेसाठी वाहतूकही प्रभावित झाली होती.

नैसर्गिक आपत्ती पिच्छा सोडेना

खरीप हंगामात पावसात सातत्य नसते. परतीच्या पावसामुळे सोयाबीनला फटका बसतो. रब्बी हंगामात गारपिट व अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसतो. गत दोन वर्षांत उन्हाळी हंगामातदेखील अवकाळी पाऊस येत असल्याने उन्हाळी पिकांना फटका बसत आहे. नैसर्गिक आपत्तीदेखील पिच्छा सोडत नसल्याने शेतकऱ्यांना पीक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

नुकसानभरपाई मिळणार केव्हा?

मागील तीन महिन्यांत गारपिट, अवकाळी पावसामुळे रब्बी व खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही. नुकसानभरपाईची रक्कम केव्हा मिळणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसFarmerशेतकरी