शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

‘अवकाळी’चे ढग दाटले; उन्हाळी पिके धोक्यात! पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By संतोष वानखडे | Updated: May 15, 2024 16:08 IST

मंगळवार, १४ मे रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.

वाशिम : मे महिन्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसत असल्याने उन्हाळी पिकांना जबर फटका बसत आहे. मंगळवार, १४ मे रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.

जिल्ह्यात सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असलेले शेतकरी रब्बी हंगामानंतर उन्हाळी पिकांना पसंती देतात. यंदा उन्हाळी पीक पेऱ्यातही लक्षणीय वाढ झाली. जिल्ह्यात सरासरी ५९५४.९५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी अपेक्षीत असताना, प्रत्यक्षात ७९०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. यंदाच्या उन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमुग, उन्हाळी मुग व उडीद, सोयाबीन, ज्वारी, तीळ, मका या पिकांवर शेतकऱ्यांचा भर अधिक होता. यंदा उन्हाळ्यात मार्च ते १३ मे पर्यंत अधूनमधून गारपिट, वादळवारा व अवकाळी पाऊस झाल्याने उन्हाळी पिकांना फटका बसला. १४ मे रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास वाशिमसह जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने मूग, उडीद, सोयाबीनसह फळबागेलाही फटका बसला.

मालेगाव तालुक्यात जवळपास दीड तास अवकाळी पाऊस झाल्याने मूग पिकाची प्रचंड नासाडी झाली. पांगरी नवघरे परिसरात शेतात कापणी करून ठेवलेले मूग पीक संपूर्णत: भिजले. कापणी करून ठेवलेल्या या मूग पिकाच्या गंजीला १५ मे रोजी शेतकऱ्यांनी फेरबदल करीत पीक वाचविण्यासाठ धावपळ केल्याचे दिसून आले. वादळवाऱ्यामुळे मालेगाव ते वाशिम या महामार्गावरील काही झाडे उन्मळून पडल्याने रात्रीच्या सुमारास काही वेळेसाठी वाहतूकही प्रभावित झाली होती.

नैसर्गिक आपत्ती पिच्छा सोडेना

खरीप हंगामात पावसात सातत्य नसते. परतीच्या पावसामुळे सोयाबीनला फटका बसतो. रब्बी हंगामात गारपिट व अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसतो. गत दोन वर्षांत उन्हाळी हंगामातदेखील अवकाळी पाऊस येत असल्याने उन्हाळी पिकांना फटका बसत आहे. नैसर्गिक आपत्तीदेखील पिच्छा सोडत नसल्याने शेतकऱ्यांना पीक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

नुकसानभरपाई मिळणार केव्हा?

मागील तीन महिन्यांत गारपिट, अवकाळी पावसामुळे रब्बी व खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही. नुकसानभरपाईची रक्कम केव्हा मिळणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसFarmerशेतकरी