शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

‘अवकाळी’चे ढग दाटले; उन्हाळी पिके धोक्यात! पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By संतोष वानखडे | Updated: May 15, 2024 16:08 IST

मंगळवार, १४ मे रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.

वाशिम : मे महिन्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसत असल्याने उन्हाळी पिकांना जबर फटका बसत आहे. मंगळवार, १४ मे रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.

जिल्ह्यात सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असलेले शेतकरी रब्बी हंगामानंतर उन्हाळी पिकांना पसंती देतात. यंदा उन्हाळी पीक पेऱ्यातही लक्षणीय वाढ झाली. जिल्ह्यात सरासरी ५९५४.९५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी अपेक्षीत असताना, प्रत्यक्षात ७९०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. यंदाच्या उन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमुग, उन्हाळी मुग व उडीद, सोयाबीन, ज्वारी, तीळ, मका या पिकांवर शेतकऱ्यांचा भर अधिक होता. यंदा उन्हाळ्यात मार्च ते १३ मे पर्यंत अधूनमधून गारपिट, वादळवारा व अवकाळी पाऊस झाल्याने उन्हाळी पिकांना फटका बसला. १४ मे रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास वाशिमसह जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने मूग, उडीद, सोयाबीनसह फळबागेलाही फटका बसला.

मालेगाव तालुक्यात जवळपास दीड तास अवकाळी पाऊस झाल्याने मूग पिकाची प्रचंड नासाडी झाली. पांगरी नवघरे परिसरात शेतात कापणी करून ठेवलेले मूग पीक संपूर्णत: भिजले. कापणी करून ठेवलेल्या या मूग पिकाच्या गंजीला १५ मे रोजी शेतकऱ्यांनी फेरबदल करीत पीक वाचविण्यासाठ धावपळ केल्याचे दिसून आले. वादळवाऱ्यामुळे मालेगाव ते वाशिम या महामार्गावरील काही झाडे उन्मळून पडल्याने रात्रीच्या सुमारास काही वेळेसाठी वाहतूकही प्रभावित झाली होती.

नैसर्गिक आपत्ती पिच्छा सोडेना

खरीप हंगामात पावसात सातत्य नसते. परतीच्या पावसामुळे सोयाबीनला फटका बसतो. रब्बी हंगामात गारपिट व अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसतो. गत दोन वर्षांत उन्हाळी हंगामातदेखील अवकाळी पाऊस येत असल्याने उन्हाळी पिकांना फटका बसत आहे. नैसर्गिक आपत्तीदेखील पिच्छा सोडत नसल्याने शेतकऱ्यांना पीक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

नुकसानभरपाई मिळणार केव्हा?

मागील तीन महिन्यांत गारपिट, अवकाळी पावसामुळे रब्बी व खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही. नुकसानभरपाईची रक्कम केव्हा मिळणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसFarmerशेतकरी