शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिवसेना शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे -  रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:22 IST

मागील पावणे दोन महिन्यापासून राज्यात पाऊस  नसल्याने पावसाअभावी खरीप हंगामातील सोयाबीन,  मुग, उडीद, ज्वारी इत्यादी पिके शेतकर्‍यांच्या हातातील  गेलेले आहे. तर कापसाचे उत्पादन निम्म्यावर येवुन ठे पले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.  अशा परिस्थितीत शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे,मु ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन शे तकर्‍यांना आर्थिक मदत देण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न  सुरु आहे असे सांगत शिवसेना शेतकर्‍यांच्या पाठीशी  खंबीरपणे उभी आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे विदर्भ  संपर्क नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी  केले.

ठळक मुद्देवाशिम येथे शिवसेनेचा मार्गदर्शन मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मागील पावणे दोन महिन्यापासून राज्यात पाऊस  नसल्याने पावसाअभावी खरीप हंगामातील सोयाबीन,  मुग, उडीद, ज्वारी इत्यादी पिके शेतकर्‍यांच्या हातातील  गेलेले आहे. तर कापसाचे उत्पादन निम्म्यावर येवुन ठे पले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.  अशा परिस्थितीत शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे,मु ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन शे तकर्‍यांना आर्थिक मदत देण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न  सुरु आहे असे सांगत शिवसेना शेतकर्‍यांच्या पाठीशी  खंबीरपणे उभी आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे विदर्भ  संपर्क नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी  केले.स्थानिक परशुराम भवन येथे गुरुवार ७ सप्टेंबर रोजी  जिल्हा शिवसेनेच्यावतीने आजीमाजी पदाधिकारी व  शिवसैनिकांसाठी  मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात  आला होता. याप्रसंगी नामदार रावते प्रमुख मार्गदर्शक  म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपिठावर पालकमंत्री  संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार श्रीकांत  देशपांडे, माजी आमदार विजयराज शिंदे, नगराध्यक्ष  अशोक हेडा, जिल्हा प्रमुख राजेश पाटील, माजी जिल्हा  प्रमुख डॉ.सुधीर कव्हर,  पंजाबराव झनक, उपजिल्हा  प्रमुख माणिक देशमुख, जि.प.सभापती विश्‍वनाथ सान प, डॉ.सुभाष राठोड, नगरसेवक अँड.विशाल  खंडेलवाल, राजु भांदुर्गे, अतुल वाटाणे, निलेश  पेंढारकर, तालुका प्रमुख गजानन भांदुर्गे, तालुका प्रमुख  विवेक नाकाडे आदि उपस्थित होते. याप्रसंगी ना.रावते पुढे म्हणाले की, हिंदु हृदय सम्राट  बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण घेवुन हातात  शिवबंधन घातलेल्या शिवसैनिकांनी ग्रामीण पातळीवर  घराघरात शिवसेना पोहोचविण्यासाठी झटले पाहिजे. या प्रसंगी रावते यांनी आगामी सोमवार ११ सप्टेंबर रोजी सं पूर्ण राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसैनिक  राज्यव्यापी भव्य मोर्चा काढुन नवरात्रीमध्ये शेतकर्‍यांना  कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी शासनाकडे करीत  असल्याचे माहिती दिली. याप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांनी आपल्या  मार्गदर्शनपर भाषणात वाशिम जिल्ह्यात शिवसेनेमध्ये गट  तट अथवा मतभेद नसल्याचे स्पष्ट करीत शिवसैनिकांनी  संघटीतपणे कार्य करण्याचे आवाहन केले. तर खासदार  भावना गवळी यांनी कमी बोलणे व जास्त काम करणे  यावर आपला भर असुन दोन्ही जिल्ह्यातील  शिवसैनिकांच्या पाठीशी उभी असल्याचे सांगितले.  शिवसेना वाढीसाठी आपण पोटतिडकीने काम करणार  असल्याचे सांगत जाहीरातीमध्ये आपला फोटो न  टाकणार्‍या तसेच मुद्दामुन लहान किंवा मोठे फोटो  टाकणार्‍यांना खडेबोल सुनावले. यामुळे आपल्यावर  कुठलाही परिणाम होणार नसुन आपण एकनिष्ठतेने  काम करीत राहु असे म्हटले. शिवसैनिक मार्गदर्शन मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हा  प्रमुख राजेश पाटील , शिव आरोग्य सेना प्रदेश  कार्यकारिणी सदस्य डॉ. श्याम  जाधव यांच्यासह हरिष  सारडा, सुरेश कदम, रमेश घुगे, दिनेश राठोड, माजी  जिल्हा परिषद सदस्य डॉ.सुभाष राठोड, नागोराव ठेंगडे,  दिलीप काष्टे , रवि पाटील, नितीन मडके, उमेश मोहळे,  गणेश गाभणे, राजाभैय्या पवार, गणेश ठाकरे, आदिंनी  परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रमुख राजेश पाटील तर  संचालन व आभार प्रदर्शन हरिष सारडा यानी केले.याप्रसंगी कैलास गोरे, सुरेश मापारी, किरण धामणे, बंडु  शिंदे, विशाल खंडेलवाल, संजय जोशी, सुरज इंगळे  आदिसह शिवसेनेचे जिल्ह्यातील आजीमाजी पदाधिकारी  जि.प. व पं.स.पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठय़ा सं ख्येने उपस्थित होते.