संभाजी महाराजांनी वारकरी संप्रदायास संरक्षण दिले : मिटकरी
By Admin | Updated: May 24, 2014 01:18 IST2014-05-24T01:04:03+5:302014-05-24T01:18:24+5:30
वारकरी संप्रदायाला संरक्षण देण्याचे काम खर्या अर्थाने संभाजीराजांनी केले, प्रा.अमोल मिटकरी यांचे मत

संभाजी महाराजांनी वारकरी संप्रदायास संरक्षण दिले : मिटकरी
कारंजालाड : छत्रपती संभाजी राजे यांनी पालखीची परंपरा सुरू ठेवली. वारकरी संप्रदायाला संरक्षण देण्याचे काम खर्या अर्थाने संभाजीराजांनी केले, असे मत प्रा.अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले. २१ मे रोजी स्थानिक मुलजी जेठा हायस्कूलच्या प्रांगणात संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संजय काकडे होते. पुढे बोलतांना मिटकरी म्हणाले की, तुकाराम महाराजांची गाथा वाचल्याशिवाय माथा सुधारणार नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास काही विकृत इतिहासकारांनी चुकीच्या पद्धतीने मोडून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र केले. परंतु संभाजी ब्रिगेडच्या इतिहासकारांनी संशोधन करून खरा इतिहास समोर आणला तो इतिहास आजच्या युवकांना खर्या अर्थाने प्रेरणादायी ठरणारा आहे. असे मत मिटकरी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.