शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

रोहयोची कामे मिळेनात; कामगारांची पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST

चेकपोस्ट कार्यान्वित करण्याची मागणी उंबर्डा बाजार : येथून जवळच असलेल्या यवतमाळ-वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर सावळी फाट्यानजीक पोलिसांची गतवर्षी चेकपोस्ट होती. ...

चेकपोस्ट कार्यान्वित करण्याची मागणी

उंबर्डा बाजार : येथून जवळच असलेल्या यवतमाळ-वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर सावळी फाट्यानजीक पोलिसांची गतवर्षी चेकपोस्ट होती. यामुळे कोरोनावर बहुतांशी नियंत्रण मिळविणे शक्य झाले होते. तशीच चेकपोस्ट पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

वीजपुरवठ्यात व्यत्यय; नागरिक त्रस्त

वाशिम : गत काही दिवसांपासून मोहरी (ता. मंगरूळपीर) परिसरातील गावांत वीजपुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. शनिवारीदेखील दुपारच्या सुमारास असाच प्रकार घडल्याने नागरिकांची गैरसोय झाली. किमान उन्हाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी होत आहे.

कनेक्टिव्हिटीअभावी शेतकरी त्रस्त

वाशिम : गत काही दिवसांपासून तालुक्यातील अनेक गावांमध्ये इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन स्वरूपात चालणारी प्रशासकीय कामे खोळंबत असल्याचे दिसून येत आहे.

नाल्यांच्या सफाईबाबत उदासीनता

मानोरा : मानोरा तालुक्यातील आसोला खु. येथे नाल्यांची साफसफाई करण्याबाबत ग्रामपंचायत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. रविवारी गावातील सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसले. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी

वाशिम : शहराबाहेरच्या शेलू फाट्यानजीक वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तळ ठोकून रविवारी प्रत्येक वाहनचालकांकडील कागदपत्रांची तपासणी केली. नियम तोडणाऱ्यांवर यावेळी कारवाई करण्यात आली.

आधार केंद्र सुरू करण्याची मागणी

वाशिम : कोरोनामुळे जनता आधीच अडचणीत असताना अनेक ठिकाणची आधार केंद्रेही बंद आहेत. त्यामुळे बँक व्यवहारांसह विविध शासकीय कामांत अडचणी येत असल्याने जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागांसह शहरी भागांत आधार नोंदणी, दुरुस्ती केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

पाणीटंचाई उपाययोजना राबविण्याची मागणी

मेडशी : मेडशी जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.

रोजगार देण्याची मागणी

इंझोरी : परिसरातील गावातून रोजगारासाठी परजिल्ह्यात गेलेले शेकडो कामगार गावी परत आले आहेत. मात्र, परिसरात शेतीशिवाय कोणतीच कामे नसल्याने हे कामगार बेरोजगार झाले आहेत. प्रशासनाने या कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

रेतीअभावी रखडली घरकुलांची कामे

वाशिम : चालूवर्षीही अद्याप जिल्ह्यात एकाही रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही. ही परिस्थिती गेल्या पाच ते सहा वर्षांपासून कायम आहे. यामुळे रेती मिळेनाशी झाल्याने विशेषत: घरकुलांची कामे रखडली आहेत.

माहूरवेशीच्या डागडुजीची मागणी

वाशिम : शहरातील पुरातन माहूरवेशीची पडझड झाली असून, हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तथापि, वेशीची डागडुजी करून साैंदर्यीकरण करण्याची मागणी श्याम उफाडे यांनी केली.