शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

रिसोडला आणखी १५ दिवस मिळणार पिवळेच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 4:15 PM

उन्हाचा पारा वाढल्याने एप्रिल महिन्यात या पाण्याचा रंग पिवळा होतो आणि पुढील आठ ते १५ दिवस पाणी असेच राहणार असल्याचे कळले. 

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : गेल्या १५ दिवसांपासून रिसोड शहराला अडोळ येथील प्रकल्पातून पिवळ्या पाण्याचा पुरवठा होत आहे. या पृष्ठभुमीवर लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर रिसोडच्या नगराध्यक्ष विजयमाला आसनकर यांनी या प्रकल्पाला भेट देऊन पाण्याची पाहणी केली आणि माहिती घेतली. उन्हाचा पारा वाढल्याने एप्रिल महिन्यात या पाण्याचा रंग पिवळा होतो आणि पुढील आठ ते १५ दिवस पाणी असेच राहणार असल्याचे कळले. रिसोड शहराला मालेगाव तालुक्यातील अडोळ धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. तथापि, गेल्या १५ दिवसांपासून या धरणातून नळाद्वारे सोडण्यात येत असलेले पाणी पिवळ्या रंगाचे असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. या दुषित पाण्यामुळे आजाराची भिती असल्याने नागरिक कॅनचे पाणी विकत घेऊ लागले. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन नगराध्यक्षांनी शनिवारी या धरणाची पाहणी केली. त्यावेळी एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा वाढल्यानंतर या धरणातील पाण्याचा रंग पिवळा होत असल्याचे येथे १५ वर्षांपासून काम करणाºया कर्मचाºयाने सांगितले. तथापि, हे पाणी पिण्यास घातक नसून, एप्रिल महिना संपल्यानंतर पुन्हा पाणी निवळणार असल्याने हे पाणी पिण्यास हरकत नाही, असेही त्याने सांगितले.  नगर परिषदेने केले सर्व उपायअडोळ प्रकल्पातून रिसोड शहरात नळाद्वारे सोडण्यात येत असलेले पाणी पिवळ्या रंगाचे असल्याने नागरिकांत भिती निर्माण झाली होती. याची दखल नगर परिषद प्रशासनाने घेतली आणि पाणी शुद्ध करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पाची साफसफाई केली. त्यात आवश्यक त्या प्रमाणात तुरटीही टाकली. त्यामुळे पाणी निवळून स्वच्छ पाणी पुरवठा होण्याची अपेक्षा होती; परंतु या सर्व उपाय योजनानंतरही नळाद्वारे सोडलेले पाणी पिवळेच असल्याचे आढळून आले. त्यात आता आणखी तुरटी टाकणे अपायकारक आहे. नगराध्यक्षांच्या मते पाणी योग्य वातावरणातील बदलामुळे रिसोड शहराला पाणी पुरवठा करणाºया अडोळ धरणाच्या पाण्याचा रंग पिवळा झाला आहे. तथापि, हे पाणी दुषित नसून, यामुळे आरोग्यास कुठलाही धोका नाही. नागरिकांनी हे पाणी पिण्यास काहीच हरकत नाही, असे मत रिसोडच्या नगराध्यक्ष विजयमाना आसनकर यांनी धरणाची पाहणी करून माहिती घेतल्यानंतर व्यक्त केले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडWaterपाणी