शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईचा खाजगी टँकरधारकांकडून गैरफायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 13:57 IST

वाशिम: जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना त्यांच्यापुढे पर्याय नसल्याने खाजगी टँकरधारकांनी वारेमाप दरवाढ करून त्याचा गैरफायदा चालविल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत आहे.

ठळक मुद्देएक हजार लीटरच्या टँकरचे तब्बल ३०० रुपये नागरिकांकडून वसुल केले जात असून, आता मागणी वाढल्याने एका टँकरसाठी दोन दिवस प्रतिक्षाही करावी लागत आहे. मालेगाव, मंगरुळपीर आणि वाशिम या तीन शहरांत, तर पाणी पेटल्याचेच दिसत असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: झगडावे लागत आहे. दुसरीकडे काही समाजसेवक मोफत पाणी पुरवठा करीत असले तरी, पाण्यासाठी टँकरवर गर्दी उसळून वाद घडत आहेत. 

वाशिम: जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना त्यांच्यापुढे पर्याय नसल्याने खाजगी टँकरधारकांनी वारेमाप दरवाढ करून त्याचा गैरफायदा चालविल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत आहे. गेल्या महिनाभरात टँकरच्या पाण्याचे दर तिप्पट झाल्याने नागरिकांना पाणीही विकत घेणे कठीण झाले आहे.वाशिम जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला. परिणामी पुरेसा जलसाठा झाला नसल्याने १०० जलप्रकल्पांत आता केवळ कोरडा गाळच उरला आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी मोठा हाहाकार सुरू असून, वापराची गोष्ट सोडाच पण पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण झाले आहे. नागरिकांच्या या अडचणींचा फायदा खाजगी टँकरधारकांनी उचलायला सुरूवात केली आहे. एक हजार लीटरच्या टँकरचे तब्बल ३०० रुपये नागरिकांकडून वसुल केले जात असून, आता मागणी वाढल्याने एका टँकरसाठी दोन दिवस प्रतिक्षाही करावी लागत आहे. मालेगाव, मंगरुळपीर आणि वाशिम या तीन शहरांत, तर पाणी पेटल्याचेच दिसत असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: झगडावे लागत आहे. या तिन्ही ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रस्तावित केलेल्या तात्पुरत्या योजना कोट्यवधी रुपये खर्चूनही बोंबलल्या आहेत. वाशिमची ८ कोटींची योजना अद्याप कार्यान्वित झाली नाही, तर मालेगावची १.३७ कोटींची योजना कंत्राटदार आणि पदाधिकाºयांच्या चुकीमुळे फसली आहे. मंगरुळपीरची योजना कुचकामी ठरणार असल्याचे स्पष्ट चित्र असतानाही या योजनेसाठी अद्यापही कामच सुरू असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात ही योजना १५ जूनपर्यंत कार्यान्वित करण्याची अट शासन निर्णयातच नमूद असताना त्याला मुदतवाढ मागण्यात आली आहे. पूर्वी निर्धारित मुदतीनंतर या योजनेचे काम करूनही त्याचा फायदा होणार नसताना याचे काम सुरू असेल, तर कशासाठी हा प्रश्नही उपस्थित होत आहे.  माणुसकीचा पडला विसर तहानलेल्यांना पाणी पाजणे हा खूप मोठा मानव धर्म आहे. प्रत्येक समाजात पाणी पाजने हे पुण्याचे काम मानले जाते. आता जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने विहिरधारकांनी जनतेची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षीत होते. त्यासाठी त्यांनी आपल्या विहिरी खुल्या करणेही आवश्यक होते; परंतु परिस्थिती अगदी त्या उलट आहे. विहिरीला भरपूर पाणी असलेल्या शेतकºयांनी तहानलेल्या लोकांची गरज ओळखून पाण्याचा बाजार भरविला आहे. वारेमाप पैशांची मागणी करतानाच टँकर हवे, असेल तर दोन दिवस आधी फोन करून मागणी नोंदवून घेण्याच्या सुचना त्यांच्याकडून करण्यात येत आहेत. दुसरीकडे काही समाजसेवक मोफत पाणी पुरवठा करीत असले तरी, पाण्यासाठी टँकरवर गर्दी उसळून वाद घडत आहेत.  मंगरुळपीर शहर वाऱ्यावरमंगरुळपीर शहरात पालिके ने लोकांची तहान भागविण्यासाठी विहिरीचे अधिग्रहण करून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला; परंतु लगेचच तो बंद करून टँकरचे पाणी जलकुंभात सोडून नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे ठरले; परंतु याचा फायदा अनेक प्रभागांना होत नसल्याचे दिसते. त्यातही जलकुंभात धरणातील गाळ मिश्रीत पाणी टाकून त्याचे शुद्धीकरण न करताच ते घाणपाणी नळाद्वारे नागरिकांना पुरविण्यात येत आहे. पाणीटंचाईमुळे हतबल झालेल्या आणि २० दिवसानंतर पाणी मिळालेल्या गोरगरीबांच्या पिण्यात हे पाणी आल्यास त्यांचा जीवच धोक्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणीMangrulpirमंगरूळपीर