शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईचा खाजगी टँकरधारकांकडून गैरफायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 13:57 IST

वाशिम: जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना त्यांच्यापुढे पर्याय नसल्याने खाजगी टँकरधारकांनी वारेमाप दरवाढ करून त्याचा गैरफायदा चालविल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत आहे.

ठळक मुद्देएक हजार लीटरच्या टँकरचे तब्बल ३०० रुपये नागरिकांकडून वसुल केले जात असून, आता मागणी वाढल्याने एका टँकरसाठी दोन दिवस प्रतिक्षाही करावी लागत आहे. मालेगाव, मंगरुळपीर आणि वाशिम या तीन शहरांत, तर पाणी पेटल्याचेच दिसत असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: झगडावे लागत आहे. दुसरीकडे काही समाजसेवक मोफत पाणी पुरवठा करीत असले तरी, पाण्यासाठी टँकरवर गर्दी उसळून वाद घडत आहेत. 

वाशिम: जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना त्यांच्यापुढे पर्याय नसल्याने खाजगी टँकरधारकांनी वारेमाप दरवाढ करून त्याचा गैरफायदा चालविल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत आहे. गेल्या महिनाभरात टँकरच्या पाण्याचे दर तिप्पट झाल्याने नागरिकांना पाणीही विकत घेणे कठीण झाले आहे.वाशिम जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला. परिणामी पुरेसा जलसाठा झाला नसल्याने १०० जलप्रकल्पांत आता केवळ कोरडा गाळच उरला आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी मोठा हाहाकार सुरू असून, वापराची गोष्ट सोडाच पण पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण झाले आहे. नागरिकांच्या या अडचणींचा फायदा खाजगी टँकरधारकांनी उचलायला सुरूवात केली आहे. एक हजार लीटरच्या टँकरचे तब्बल ३०० रुपये नागरिकांकडून वसुल केले जात असून, आता मागणी वाढल्याने एका टँकरसाठी दोन दिवस प्रतिक्षाही करावी लागत आहे. मालेगाव, मंगरुळपीर आणि वाशिम या तीन शहरांत, तर पाणी पेटल्याचेच दिसत असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: झगडावे लागत आहे. या तिन्ही ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रस्तावित केलेल्या तात्पुरत्या योजना कोट्यवधी रुपये खर्चूनही बोंबलल्या आहेत. वाशिमची ८ कोटींची योजना अद्याप कार्यान्वित झाली नाही, तर मालेगावची १.३७ कोटींची योजना कंत्राटदार आणि पदाधिकाºयांच्या चुकीमुळे फसली आहे. मंगरुळपीरची योजना कुचकामी ठरणार असल्याचे स्पष्ट चित्र असतानाही या योजनेसाठी अद्यापही कामच सुरू असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात ही योजना १५ जूनपर्यंत कार्यान्वित करण्याची अट शासन निर्णयातच नमूद असताना त्याला मुदतवाढ मागण्यात आली आहे. पूर्वी निर्धारित मुदतीनंतर या योजनेचे काम करूनही त्याचा फायदा होणार नसताना याचे काम सुरू असेल, तर कशासाठी हा प्रश्नही उपस्थित होत आहे.  माणुसकीचा पडला विसर तहानलेल्यांना पाणी पाजणे हा खूप मोठा मानव धर्म आहे. प्रत्येक समाजात पाणी पाजने हे पुण्याचे काम मानले जाते. आता जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने विहिरधारकांनी जनतेची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षीत होते. त्यासाठी त्यांनी आपल्या विहिरी खुल्या करणेही आवश्यक होते; परंतु परिस्थिती अगदी त्या उलट आहे. विहिरीला भरपूर पाणी असलेल्या शेतकºयांनी तहानलेल्या लोकांची गरज ओळखून पाण्याचा बाजार भरविला आहे. वारेमाप पैशांची मागणी करतानाच टँकर हवे, असेल तर दोन दिवस आधी फोन करून मागणी नोंदवून घेण्याच्या सुचना त्यांच्याकडून करण्यात येत आहेत. दुसरीकडे काही समाजसेवक मोफत पाणी पुरवठा करीत असले तरी, पाण्यासाठी टँकरवर गर्दी उसळून वाद घडत आहेत.  मंगरुळपीर शहर वाऱ्यावरमंगरुळपीर शहरात पालिके ने लोकांची तहान भागविण्यासाठी विहिरीचे अधिग्रहण करून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला; परंतु लगेचच तो बंद करून टँकरचे पाणी जलकुंभात सोडून नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे ठरले; परंतु याचा फायदा अनेक प्रभागांना होत नसल्याचे दिसते. त्यातही जलकुंभात धरणातील गाळ मिश्रीत पाणी टाकून त्याचे शुद्धीकरण न करताच ते घाणपाणी नळाद्वारे नागरिकांना पुरविण्यात येत आहे. पाणीटंचाईमुळे हतबल झालेल्या आणि २० दिवसानंतर पाणी मिळालेल्या गोरगरीबांच्या पिण्यात हे पाणी आल्यास त्यांचा जीवच धोक्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणीMangrulpirमंगरूळपीर