शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईचा खाजगी टँकरधारकांकडून गैरफायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 13:57 IST

वाशिम: जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना त्यांच्यापुढे पर्याय नसल्याने खाजगी टँकरधारकांनी वारेमाप दरवाढ करून त्याचा गैरफायदा चालविल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत आहे.

ठळक मुद्देएक हजार लीटरच्या टँकरचे तब्बल ३०० रुपये नागरिकांकडून वसुल केले जात असून, आता मागणी वाढल्याने एका टँकरसाठी दोन दिवस प्रतिक्षाही करावी लागत आहे. मालेगाव, मंगरुळपीर आणि वाशिम या तीन शहरांत, तर पाणी पेटल्याचेच दिसत असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: झगडावे लागत आहे. दुसरीकडे काही समाजसेवक मोफत पाणी पुरवठा करीत असले तरी, पाण्यासाठी टँकरवर गर्दी उसळून वाद घडत आहेत. 

वाशिम: जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना त्यांच्यापुढे पर्याय नसल्याने खाजगी टँकरधारकांनी वारेमाप दरवाढ करून त्याचा गैरफायदा चालविल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत आहे. गेल्या महिनाभरात टँकरच्या पाण्याचे दर तिप्पट झाल्याने नागरिकांना पाणीही विकत घेणे कठीण झाले आहे.वाशिम जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला. परिणामी पुरेसा जलसाठा झाला नसल्याने १०० जलप्रकल्पांत आता केवळ कोरडा गाळच उरला आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी मोठा हाहाकार सुरू असून, वापराची गोष्ट सोडाच पण पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण झाले आहे. नागरिकांच्या या अडचणींचा फायदा खाजगी टँकरधारकांनी उचलायला सुरूवात केली आहे. एक हजार लीटरच्या टँकरचे तब्बल ३०० रुपये नागरिकांकडून वसुल केले जात असून, आता मागणी वाढल्याने एका टँकरसाठी दोन दिवस प्रतिक्षाही करावी लागत आहे. मालेगाव, मंगरुळपीर आणि वाशिम या तीन शहरांत, तर पाणी पेटल्याचेच दिसत असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: झगडावे लागत आहे. या तिन्ही ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रस्तावित केलेल्या तात्पुरत्या योजना कोट्यवधी रुपये खर्चूनही बोंबलल्या आहेत. वाशिमची ८ कोटींची योजना अद्याप कार्यान्वित झाली नाही, तर मालेगावची १.३७ कोटींची योजना कंत्राटदार आणि पदाधिकाºयांच्या चुकीमुळे फसली आहे. मंगरुळपीरची योजना कुचकामी ठरणार असल्याचे स्पष्ट चित्र असतानाही या योजनेसाठी अद्यापही कामच सुरू असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात ही योजना १५ जूनपर्यंत कार्यान्वित करण्याची अट शासन निर्णयातच नमूद असताना त्याला मुदतवाढ मागण्यात आली आहे. पूर्वी निर्धारित मुदतीनंतर या योजनेचे काम करूनही त्याचा फायदा होणार नसताना याचे काम सुरू असेल, तर कशासाठी हा प्रश्नही उपस्थित होत आहे.  माणुसकीचा पडला विसर तहानलेल्यांना पाणी पाजणे हा खूप मोठा मानव धर्म आहे. प्रत्येक समाजात पाणी पाजने हे पुण्याचे काम मानले जाते. आता जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने विहिरधारकांनी जनतेची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षीत होते. त्यासाठी त्यांनी आपल्या विहिरी खुल्या करणेही आवश्यक होते; परंतु परिस्थिती अगदी त्या उलट आहे. विहिरीला भरपूर पाणी असलेल्या शेतकºयांनी तहानलेल्या लोकांची गरज ओळखून पाण्याचा बाजार भरविला आहे. वारेमाप पैशांची मागणी करतानाच टँकर हवे, असेल तर दोन दिवस आधी फोन करून मागणी नोंदवून घेण्याच्या सुचना त्यांच्याकडून करण्यात येत आहेत. दुसरीकडे काही समाजसेवक मोफत पाणी पुरवठा करीत असले तरी, पाण्यासाठी टँकरवर गर्दी उसळून वाद घडत आहेत.  मंगरुळपीर शहर वाऱ्यावरमंगरुळपीर शहरात पालिके ने लोकांची तहान भागविण्यासाठी विहिरीचे अधिग्रहण करून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला; परंतु लगेचच तो बंद करून टँकरचे पाणी जलकुंभात सोडून नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे ठरले; परंतु याचा फायदा अनेक प्रभागांना होत नसल्याचे दिसते. त्यातही जलकुंभात धरणातील गाळ मिश्रीत पाणी टाकून त्याचे शुद्धीकरण न करताच ते घाणपाणी नळाद्वारे नागरिकांना पुरविण्यात येत आहे. पाणीटंचाईमुळे हतबल झालेल्या आणि २० दिवसानंतर पाणी मिळालेल्या गोरगरीबांच्या पिण्यात हे पाणी आल्यास त्यांचा जीवच धोक्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणीMangrulpirमंगरूळपीर