शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईचा खाजगी टँकरधारकांकडून गैरफायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 13:57 IST

वाशिम: जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना त्यांच्यापुढे पर्याय नसल्याने खाजगी टँकरधारकांनी वारेमाप दरवाढ करून त्याचा गैरफायदा चालविल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत आहे.

ठळक मुद्देएक हजार लीटरच्या टँकरचे तब्बल ३०० रुपये नागरिकांकडून वसुल केले जात असून, आता मागणी वाढल्याने एका टँकरसाठी दोन दिवस प्रतिक्षाही करावी लागत आहे. मालेगाव, मंगरुळपीर आणि वाशिम या तीन शहरांत, तर पाणी पेटल्याचेच दिसत असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: झगडावे लागत आहे. दुसरीकडे काही समाजसेवक मोफत पाणी पुरवठा करीत असले तरी, पाण्यासाठी टँकरवर गर्दी उसळून वाद घडत आहेत. 

वाशिम: जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असताना त्यांच्यापुढे पर्याय नसल्याने खाजगी टँकरधारकांनी वारेमाप दरवाढ करून त्याचा गैरफायदा चालविल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत आहे. गेल्या महिनाभरात टँकरच्या पाण्याचे दर तिप्पट झाल्याने नागरिकांना पाणीही विकत घेणे कठीण झाले आहे.वाशिम जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला. परिणामी पुरेसा जलसाठा झाला नसल्याने १०० जलप्रकल्पांत आता केवळ कोरडा गाळच उरला आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी मोठा हाहाकार सुरू असून, वापराची गोष्ट सोडाच पण पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण झाले आहे. नागरिकांच्या या अडचणींचा फायदा खाजगी टँकरधारकांनी उचलायला सुरूवात केली आहे. एक हजार लीटरच्या टँकरचे तब्बल ३०० रुपये नागरिकांकडून वसुल केले जात असून, आता मागणी वाढल्याने एका टँकरसाठी दोन दिवस प्रतिक्षाही करावी लागत आहे. मालेगाव, मंगरुळपीर आणि वाशिम या तीन शहरांत, तर पाणी पेटल्याचेच दिसत असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: झगडावे लागत आहे. या तिन्ही ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रस्तावित केलेल्या तात्पुरत्या योजना कोट्यवधी रुपये खर्चूनही बोंबलल्या आहेत. वाशिमची ८ कोटींची योजना अद्याप कार्यान्वित झाली नाही, तर मालेगावची १.३७ कोटींची योजना कंत्राटदार आणि पदाधिकाºयांच्या चुकीमुळे फसली आहे. मंगरुळपीरची योजना कुचकामी ठरणार असल्याचे स्पष्ट चित्र असतानाही या योजनेसाठी अद्यापही कामच सुरू असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात ही योजना १५ जूनपर्यंत कार्यान्वित करण्याची अट शासन निर्णयातच नमूद असताना त्याला मुदतवाढ मागण्यात आली आहे. पूर्वी निर्धारित मुदतीनंतर या योजनेचे काम करूनही त्याचा फायदा होणार नसताना याचे काम सुरू असेल, तर कशासाठी हा प्रश्नही उपस्थित होत आहे.  माणुसकीचा पडला विसर तहानलेल्यांना पाणी पाजणे हा खूप मोठा मानव धर्म आहे. प्रत्येक समाजात पाणी पाजने हे पुण्याचे काम मानले जाते. आता जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने विहिरधारकांनी जनतेची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षीत होते. त्यासाठी त्यांनी आपल्या विहिरी खुल्या करणेही आवश्यक होते; परंतु परिस्थिती अगदी त्या उलट आहे. विहिरीला भरपूर पाणी असलेल्या शेतकºयांनी तहानलेल्या लोकांची गरज ओळखून पाण्याचा बाजार भरविला आहे. वारेमाप पैशांची मागणी करतानाच टँकर हवे, असेल तर दोन दिवस आधी फोन करून मागणी नोंदवून घेण्याच्या सुचना त्यांच्याकडून करण्यात येत आहेत. दुसरीकडे काही समाजसेवक मोफत पाणी पुरवठा करीत असले तरी, पाण्यासाठी टँकरवर गर्दी उसळून वाद घडत आहेत.  मंगरुळपीर शहर वाऱ्यावरमंगरुळपीर शहरात पालिके ने लोकांची तहान भागविण्यासाठी विहिरीचे अधिग्रहण करून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला; परंतु लगेचच तो बंद करून टँकरचे पाणी जलकुंभात सोडून नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे ठरले; परंतु याचा फायदा अनेक प्रभागांना होत नसल्याचे दिसते. त्यातही जलकुंभात धरणातील गाळ मिश्रीत पाणी टाकून त्याचे शुद्धीकरण न करताच ते घाणपाणी नळाद्वारे नागरिकांना पुरविण्यात येत आहे. पाणीटंचाईमुळे हतबल झालेल्या आणि २० दिवसानंतर पाणी मिळालेल्या गोरगरीबांच्या पिण्यात हे पाणी आल्यास त्यांचा जीवच धोक्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणीMangrulpirमंगरूळपीर