पाळोदी, दि. ६- ग्राम पाळोदी येथील बसस्टँड वरील दोन रोहित्र बिघडले असून अद्यापही दुरुस्ती करण्यात आले नाही. दोन्ही रोहित्र गेल्या दोन वर्षांंपासून बंद रोहित्र आहे.येथील बसस्टँड वरील लोकांना गावामधून विद्युत पुरवठा मंदिराजवळील रोहित्रावरून करण्यात येत आहेत. या रोहित्रावरून गावामध्ये १५0 घरांना विद्युत पुरवठा होत अंधाराचा सामना करावा लागणार आहेत. या रोहित्राचे नेहमी रात्री-बेरात्री फेज बसविण्यासाठी जो लागत आहेत. यामध्ये जिवास धोका झाल्यास जबाबदार कोण राहणार, या रोहित्राला पेटीमध्ये फेज फुटले आहेत. तरीही दुर्लक्ष होत आहे. तरी संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून आहे.
पाळोदीत दोन वर्षांंपासून रोहित्र बंद!
By admin | Updated: November 7, 2016 02:45 IST